Wednesday, December 19, 2018

अमेरिका ८

अमेरिका ८ 

तेजाब मध्ये अनिल कपूर एक डायलॉक मारतो कि नासिक हो या मुंबई लडकी पटाने का फॉर्मुला एक हि होता हय तारिका  अलग .... असा काय सस ..... मी खूप वेळा म्हणालोय कि आपण खूप वेगळे आहोत ...आज असं म्हणतो कि आपण वेगळे आहोत पण तरी थोडे शेम टू शेम आहोत 


त्यांच्या बातम्या शेम आपल्यागत , एकदम बडा चढाके, त्यांचे बुद्धी जीवी पण तसेच, येऊ द्या बाहेरच्यांना येऊ द्या, (म्ह्णून तो ट्रम्प झिंकला).  TV वर ads जास्त ... पण तरी आपण खूप वेगळे ..... ही लोक ९०% मांसाहारी आपण दाखवायला ९०% शाकाहारी (आणि उरलेले सरकार नाही म्हणत म्हणून गाय खाणारी) .......  ही लोक माश्याला अन अंड्याला मांसाहार समजत नाहीत म्हणजे सगळं कोकण शाकाहार . मला कुणीतरी विचारलं कि तू व्हेज आहेस का? मी म्हंटल मला चिकन , टर्की आवडत नाही मासे आवडतात अंडी रोज खातोय इथे, अजून तरी एक प्लेट गायची ऑर्डर नाही दिलीये. तर you are veg म्हणाला. इथे मिळेल तेव्हा मासा खातो पण ताजा नाहीच .... असो मी पणा आला फार .... गुण नाही पण वाण आला ह्यांचा ....वाण कसली येते त्यांच्या एका बुटात आपलं शु रॅक येईल.

तर मला आत्त्ता कळलं कि आपण यूरोप च्या जवळ असून अमेरिकन का? मला स्वतःला यूरोप फार आवडतं एक तर माझी पहिली फेरी तिथली आणि थोडा अधिक फिरलोय म्हणून ...  इथे आपल्या सारखंच (मुंबई सोडल्यास) बशी किव्हा ट्रेन नाहीत स्वतःची गाडी हवी .... फरक म्हणजे इथे नियम पाळतात ...... दुसरं असं कि स्वतःच्या खूप प्रेमात,  सगळेच शाह रुख एकदम कॉन्फिडन्ट आगाऊ , आपण एक कवच पांघरून फिरतो आतून सगळेच शाहरुख आगाऊ ..लोक येडे वगैरे ... पण एक महत्वाचा फरक यूरोप मध्ये आणि इथे असा कि यूरोपात लोक सुट्ट्या घेतात इथे लोक खूप राबतात , म्हणजे की जिथे गेलो तिथे लोक खूप रजा घेताना नाही पाहिली ...मी आत्ता ओक्लाहोमा ला आहे तिथे शनिवार अर्धा दिवस हापिस चालू , आता बोला .

ओक्लाहोमा वरून आठवलं ... केदार म्हणाला होता you can't pay me enough to shift to oklahama त्यांना इतिहासाचं नाही ... आज मी ज्या ठिकाणी आलो त्या मालकाने  (मी ज्या कंपनीत कन्सल्टन्सी करता आलो आहे ते, माणूस खूप श्रीमंत आहे  )मला सोडताना एक थोडं ह्या सिटी बद्दल सांगितलं , (इथे राज्य पण ओक्लाहोमा आणि शहर पण तेच नाव सगळंच ते....)हे शहर १८८९ साली जन्माला आलं  आणि केए दिवशी एक तोफ उडवून जावं मजा करो असं म्हणून जी जागा घेता येईल ती तुमची असं म्हणून दहा हजार लोकांनीं हे शहर घेतलं.  आधी इथे खूप अराज्य  होत पण आता सगळं नीट आहे, तरी अमेरिकेत बंदूक पोसायला आणि बाळगायला परवानगी आहे म्ह्णून लोकांकडे बंदुका आहेत. आणि माथे फिरूंची संख्या इथे आपल्याहून अधिक.

ह्यांचा इतिहास फार तर २०० वर्ष जुना, पण ह्या ओक्लाहोमा चा १०० वर्ष इतकाच , इथे इंडियन्स लोक होती, म्हणजे आपण नाही इथले नेटिव्ह , मेक्सिकन .. हापशी , त्यांना ह्या इंग्रजानी मारून मुटकून सरळ केलं. मी त्यात फार खोलात जात नाही, पण सगळं एका सरकार खाली . मला खूप नवल वाटत ह्या गोष्टीच, कि इतका मोठा इतका मोठा ... म्हणजे लहान मुलांना विचारलं कि किती मोठा हवाय खाऊ ? कि इवले इवले हात असे फुलवून इतका शगला मोत्ता असं करतात ना? तस  ........ तर आपला मोत्ता हा एवढाच.  ह्यांचा म्हणजे इतका मोठा कि जमिनीचा समुद्र वाटतो,  संपतच नाही न संपणारा  ..... म्हणजे मी आता दोनचार राज्य फिरलो एकातून दुसरी कडे जायला दोन तीन तास लागतात किमान आणि तरी मी अर्ध्या वर पण नाही गेलोय अमेरिकेच्या .... आणि सगळी सपाट जमीन , डोंगर दर्या नाहीच.... म्हणजे अमेरिकेत आहेत, पण मी जेवढं पाहिलं तिथे नाहीच , भारता एवढा अमेरिका मी पाहिलाय म्हणजे, क्षेत्र फळ ... एरिया केवढा असेल आपला? तेव्हढा . तरीही अजून १/३ पण नाही झाला फिरून  .... इतका मोठा देश आहे . म्हणून कौतुक कि ही लोक एकत्र अमेरिकन म्हणून राहतात, आपल्या कडे सगळ्यांना वेगळं राज्य तर सोडाच देशच वेगळा हवाय असं वाटत.

पण सांगायचा मुद्दा असा कि २०० वर्षान पूर्वी हे सगळं कस जमलं असेल? ज्या ठिकाणी जायला विमान ६ तास घेत, ते सगळं एका झेंड्या खाली एका नियमा खाली कस काय धरून ठेवल असेल? हे नवल आहे, वेळ काढून ह्यांचा इतिहास नीट आइकेन कुणाला तरी पकडून, वाचण्यात येईल ते येईल, पण ऐकणाची मजा वेगळी असते. ह्यांना खूप अभिमान आहे देशाचा , पण आपल्या सारखं लोकांना पटवून पण देत नाहीत  कि बघा मला किती आहे देशाचं आणि दुस्वास पण नाही करत आपल्या सारखा .... काही महान लोक सैनिकांना काय मान देता, त्यांना पैसा मिळतो त्या करता करतात असे म्हणणार महाबाग इथे नाही हे ह्यांच नशीब किव्हा शिकवण असेल


आपल्याला (म्हणजे मला )फक्त न्यू यॉर्क किव्हा हॉलीवूड माहित असत, नाही म्हणायला वेगास कारण तिथे कॅसिनो आहेत , पण टेक्सास हे सगळ्यात मोठं राज्य आहे ...(होत, आता अलास्का आहे).  जवळ पास २ लाख ७० हजार मैल इतका एरिया आहे, ते पण एका राज्याचा आणि असे ५२ राज्य आहेत ... आता बोला ...काय बोलणार? बोलतीच बंद केली मी . फक्त कल्पना करा एकाच राज्यात विमान दोन तास घेईल इथून तिथे जायला आणि आपण दिल्लीत जातो , ते पण ३ राज्य ओलांडून.  तरी भारत सहावा जगात मोठा देश आहे .... म्ह्णून अबब होईला होत इथे .

माझ्या मते ह्यांना भाषा आणि धर्म जोडतो , जोडून ठेवतो , सगळे इंग्रजी बोलतात (कसले बोलतात यार काहीच काळात नाही ) म्हणजे सगळेच इंग्रजीच बोलतात , आपल्याकडे शेजारचा माणूस हिंदी बोलतो (आपण मराठी) कशी राहणार एकी, सगळेच ख्रिसचन .... म्हणजे आत मध्ये बॅप्टिस्ट , कॅथलिक , प्रोटेस्टंट ह्याव आणि त्याव असतीलच, पण वरून शेम आणि कायदे पण शेम , खाण एक पिणं एक , म्हणजे अनेक आहेत , (अरे कसले अनेक त्या दिवशी आपल्या बिग बाजार एवढं मोठं दारूचं दुकान पाहिलं अबबब ...)पण पितात,  वर्ज नाही खर तर वर्ज काहीच नाही , पण मान समान आहे, आपली माणसं देव देव केलं तरी मूर्ख म्हणतात नाही केलं कि पागल आणि दोघंही एक मेकांच्या उरावर ... ते स्वातंत्र्य इथे आहे, म्हणून इतका मोठा देश, तसा पहिला तर सुखी आहे, म्हणजे दुःख असतीलच, पण स्कॉच पिऊन मग  मोठ्या गाडीतून (गाडया पण मोठ्या अबबब )आणि मोठ्या घरात जाऊन दुखी होणं केव्हाही चांगलं.


दुसरं कारण म्हणजे (तिसरं खर तर), इथली थंडी, गुरगुट करून लोक आपापल्या घरी बसतात , -१ डिग्री मध्ये तुम्ही काय टवाळक्या करणार? किती वेळ करणार? या मुळे नुसते उपद्व्याप, भांडण बंद ... चुपचाप घरमे बैठो नाहीतर गाडीमे , कशाला मारायला भांडं भांडी होतेय? नाही पटल जा दुसरी कडे, खूप जागा खूप जमीन .
 पुढच्या वेळेस संत्रा एवढ लिंबू आणि क्रिकेट बॉल इतका मोठा कांदा ह्या बद्दल लिहेन .... 

No comments: