Saturday, February 7, 2026

Australia - extra एक अनुभव .

एक अनुभव .

आमच्या बरोबर जपान चा एक कलीग आहे मूळ हैद्राबाद , आम्ही दुपारी बाहेर जातो जेवायला ९०% सबवे कारण ते सेफ आणि बेस्ट , इथे नवीन एस्पा कबाब म्हणून त्या सबवे शेजारी पाकिस्तानी हॉटेल उघडलं आहे , मी पण दोन  दिवसाने तिकडे गेलो कारण तो जपान वाला रोज जातो हलाल मटण गॅरंटी आहे म्हणून  , मला त्या कबाब वाल्याने फार आठ्या आणून आणि चिडून कबाब दिला म्हणून मी परत नाही गेलो, पैसे देऊन तिरस्कार का सहन करा? तो माणूस बाकीच्या लोकांशी हसून थँक्स म्हणून देतो आणि मला मात्र चिडून दिलं ...  ह्ड म्हंटलं... हा मला आलेला २५ वर्षात पाकिस्तानी माणसाचा पहिला अनुभव (मी लै देश पाहिलेत, म्हणून पहिला म्हणालो, बाकीचे खूप वेगळे आहेत).

पर्वा कोल्स मध्ये (कोल्स म्हणजे आपलं dmart , पण गर्दी कमी कारण लोक संख्या कमी), एक आपला (brown skin  ), माणूस अदबीने हसला मी पण हसलो , मग काउंटर वर जाताना तोच माणूस पुढे होता, मुझे आपको देख के  लगा जैशन्करजी है (minister आपले )(पु लं म्हणतात तसं वहिदा रहमान आणि कानन बाला मध्ये दोघी बायका ह्या पलीकडे साम्य नाही तस झालं मला), मी उगाच हाहाहा केलं (मी घरी येऊन दोनदा फोटो पहिला त्यांचा, काय साम्य आहे का म्ह्णून, नाही दिसलं), इथे कसा असेल जयशंकर? म्हणालो मी, हॅलो मी सागर , तुम्ही कुठले मी आसिफ , कराची म्हणाला , मग आम्ही बोलत त्या दुकानाच्या बाहेर आलो , आम्हा ४ लोकांना बघून अरे आप साथ है ? कभी देखे नही म्हणाला , म्हंटलो अरे  १० दिवसा करता आलोय, तर आग्रह केला त्याने , आओ खाना खाने , दमलो म्हणलो घरी जातोय जस्ट ऑफिसातून आलोय. चाय तो पिलो , अगदी प्रेमाचं आमंत्रण वजा हट्ट , समोर राहतो म्हणला , १५ मिनिट से क्या होगा ? बायको डॉक्टर आहे, ८ महिन्या आधी आलो छोटा गाव है म्हणाला , चला गप्पा मारू , चाय पिके खाना खाके जाईये म्हणाला . अरे चाय तो पिलो मस्त चहा करतो परत तोच आग्रह . मला खूप जेवायला जायचं आहे, दाल चावल खायला चालेल असं वाटलं , एक तर पाकिस्तानी जेवण एक नंबर असतं आणि इथे डायरेक्ट पाकिस्तानीच  जेवण देणार , प्लस आठ दिवस नुसता पाव खातोय आणि इतकं प्रेमाचं निमंत्रण होतं आणि खरंच इतकं मना पासून कि काय सांगू ? पण एकदम चार लोकं नको वाटलं (खूप उपाशी आहोत भुक्कड सारखं खाल्लं असतं ).. जाताना परत शेक हॅन्ड ,  अगळी बारी जरूर आना , परत आग्रह वजा हट्टं. अरे काय असं झालं, आता ह्या वयात खोटा आव आणि खरं काय ते कळतं आपल्याला ...

कसं काय आणि का आपण मत बनवायचं सांगा? 

सागर 





Australia -2

पारकेस - Parkes - पार्क्स.

आमचं काम पारक्स नावाच्या गावात आहे सिडनी पासून साधारण ४०० किलोमीटर असेल अंतर, इथे आहे विमानतळ पण अगदी छोटेखानी आणि २६ जानेवारीला तो बंद होता. तेच विमान दोन फेऱ्या मारतं २० सीटर वैगेरे असेल. मग आम्ही ऑरेंज नावाच्या एअरपोर्ट पर्यंत गेलो आणि तिथून मग टॅक्सी करून १०० किलोमीटर पार्क्स ला आलो.  इथे रेंट कार आहे पण ह्या गावात ती सोडता येत नाही म्हणे, अशी बहुतेक चुकीची माहिती कुणीतरी दिली होती म्ह्णून हा द्रविडी प्राणायम. (आपण भारतीय लोकं बेसिक जुगाडू असतो काहीतरी सोया शोधात राहतो हि लोक काय कि अमेरिकन काय एका  रेषेत चालतात )

ऑस्ट्रेलिया हा देश मुख्यतः शेती प्रधान देश आहे आणि खरा खुरा शेती प्रधान आहे, इथे धान्य अजिबात आणू देत नाहीत , येताना सगळं डिकलेऱ करा माझं एक रेडी टू इट भाताचं बघून तो पोलीस सैरा वैरा पळत होता , डिक्लेर नाही केलंस म्हंटला , म्हंटल अरे हा भात आहे तांदूळ नाहीये (पोलिसाला विनोद बुद्धी नसावी ) टाकून दे म्हणालो तर त्याने ते केलंच पण मला नशिबाने फक्त warning वर सोडलं , नाहीतर ४००० $ वगैरे दंड घेतला असता म्हणे .... बापरे , आयुष्य भर खाल्लेल्या भाताची किंमत पण एवढी नसेल . 

तर तुम्ही जर ऑस्ट्रेलियाला येत असाल आणि एक कण , तीळ जरी आणलात तरी सांगून आणा, तीळ भिजायची वाट न बघता हि लोकं तुमची वाट लावतील .

खुळे आहेत , असो. तर आम्ही परत सिडनी एअरपोर्ट ला चार तास थांबून शिवनेरी इतकं मोठं विमान पकडून ऑरेंज ला आलो. सिडनी एअरपोर्ट ला मज्जा न्हवती. हा शेतकरी कामगार वर्ग आहे फार आर्ट वैगेरे दिसली नाही मला. खरा भारत पाहायचा असेल तर गावात जा असं कुणी माहात्म्या ने म्हंटल आहे म्हणे , तसं इथे काही नसावं , सगळंच शेतीवाटली मला. सिडनी छान आहे शहर , मस्त आहे पण लगेच शहर संपतं. लोकं रांगडी आहेत. अमेरिकन सारखी घाईत नाही जास्त आगाऊ नाही कि यूरोप सारखी फ्रेंडली नाहीत , यूरोपात अनोळखी पण तोंड भरून गुड मॉर्निंग करतो , अगदी साहेब सुद्धा , इथे मला अजून तरी कुणी गुड मॉर्निंग नाही केलंय (ऑफिसातले करतात ). ऑरेंज एअरपोर्ट गोड होता, दोन जणांनी बॅगा विमानातून काढल्या आणि छोट्या बेल्ट वर ठेवल्या , पोलीस नाही security नाही . पण आजूबाजूला हिरवळ खूप होती ...हा एक मुख्य राहीलच कि.  सिडनी ला एअरपोर्ट अगदी पाण्याच्या जवळ आहे म्हणजे उतरताना किव्हा टेक ऑफ ला उन्नीस बीस झालं कि समुद्र , ते भारी आहे एकदम , म्हणजे आजूबाजूला. फार गर्दी वर्दळ न्हवती आजूबाजूला पण. पण उतरताना पाणी दिसलं आणि एकदम लँडिंग ऑन लँड. 

हे थोडं मोठं गाव आहे , इथे दोन चार इंडियन रेस्टॉरंट आहेत , एक म्हणजे इंडियन म्हणजे पाकिस्तानी बांगलादेशी पण असू शकतात , पण हे इंडियन आहे म्हणाला सनी, कांगारू नाही दिसले वाटेत , एकदम गाडी समोर येतात म्हंटला , जरा सावध राहावं लागतं. पण एक जाणवलं कि खूप शेती आहे सगळी कडे का नुसतं रान आहे कुणास ठाऊक . आम्ही जेव्हा ६०० किलोमीटर फिरून आलो तेव्हा रस्त्यात मेलेले कांगारू खूप दिसले, आता पर्यंत , मी जीवंत कमी आणि मेलेले जास्त पाहिले, आपल्या कडे कुत्री येतात ना गाडी खाली? इथे कांगारू येतात )


पार्क्स त्या मनाने खूप छोटं आहे गाव , १५००० लोक संख्या पण एरिया बोरिवली एवढा असेल. तापमान खूप होतं , आठवड्यात ४२ वैगेरे गेलं , AIR BNB होतं पण एकच AC हॉल मध्ये बेड रूम मध्ये नाहीच , जाम हाल झाले चार दिवस , नशिबाने आम्हाला नंतर मोटेल मध्ये ठेवलं  (भारतीय आहे ). बरंय मोटेल, पण किचन नाहीये रोज बाहेरचं.

इथे खाणी खूप आहेत , खाणीत काम करायला लोकं येतात म्हणाला इथे. लोकं इथे मोटेल मध्ये रहातात आठवडा आणि जातात शनिवारी घरी. एकतर शेती नाहीतर खाण म्हणून हि लोकं अंगा पिंडाने भारी आहेत. इथे पार्क्स मध्ये फक्त एकच असा रस्ता आहे, टाउन सेंटर तिथेच आहे सगळं, अजून एक दोन ठिकाणी दुकानं आहेत म्हणा, पण मोठा हाच रस्ता , गाडी शिवाय काम नाही इथे आणि गाड्या मोठ्याला आहेत, असायलाच हव्या कारण थोडं तास भर जाऊन यायचं असेल तरी शे सौवाशे अंतर असतं. आम्हाला पण इथे आमच्या कस्टमर नि एक गाडी देऊन दिली आहे , ऑफिस ते मोटेल आणि दुपार सबवे किव्हा चाइनीस साठी गाडी, वाण सामान आणायला पण गाडीच. 

इथे पाकिस्तानी ख्रिश्चन माणसाचं हॉटेल आहे (restaurant) आणि एक कबाब वाला आहे (त्याचा फार चांगला अनुभव नाही आला , नन्तर सांगेन ) एक चायनीस ज्याला आपलं इंग्रजी येत नाही आणि एक थाई आहे, एक दोन पब आणि चार गाडीची, हे गणित नाही कळलं मला पण आहेत बाबा चार गाडीची दुकानं आणि चार चार एक पेट्रोल पम्प. अजून चांगलं जेवण नाही मिळालं इथे. सिडनी ला त्या दिवशी रस्तयात एका गाडी वर मगर आणि कांगारू पण होते (शिजवलेले) , मला ट्राय करायचं होतं पण एक व्हेज होता मुलगा आणि एक म्हणाला आमच्या धर्मात claws असलेले प्राणी allowed नाही. राहून गेलं खायचं, वरण भात रोज खातो कांगारू वैगेरे खाऊन मागायला हवा मग ऑस्ट्रेलियात येऊन गेलो हे सांगता येईल ना. 

बाकी गाव गावासारखं आहे, इथे सगळेच इंग्रजी बोलतात म्हणून तो फरक नाही पण ह्यांना पण शहर आवडत नाही आणि गर्दी वगैरे ... भाषा सोडली तर आपल्या सारखंच . इथे फक्त एक आहे कि mcdonald अंडी KFC  subway सगळीकडे आहे आणि हि लोक सेम खातात अन्न , आपण फार व्हरायटी खातो त्या मुळे इथे अन्नाचा भेद भाव नाहीये.


पुढे इचुका नावाच्या ठिकाण्याची आणि ऑरेंज  नावाच्या जागी गेलो त्याची गम्मत सांगतो. (कांगारू वगैरे खल्ला तरी सांगेन ).













 

Thursday, February 5, 2026

Australia 1


ऑस्ट्रेलिया -

 टेक्निकली माझे सगळे खंड फिरून  झालेत , नॉर्थ अँड साऊथ अमेरिका असे दोनहि , यूरोप पण झालाय आशियात आपण राहतो, अगदी लहान  असताना आफ्रिकेट जाऊन आलोय (लहान सहान पण आठवण नाहीये) आणि आता शेवटी ऑस्ट्रेलिया... तरी अजून मला आफ्रिका नीट पाहायची आहे आणि आशिया मध्ये किमान मलेशिया पर्यंत तरी जाऊन यायचंय, असो किती झालं तरी माणसाला अजून हवंच असतं.

तर ऑस्ट्रेलिया - भौगोलीक  दृष्ट्या जरी हा देश अमेरिके सारखा दिसला तरी हा मनाने यूरोप सारखा आहे, म्हणजे अमेरिकन नाही पण धड यूरोप सुद्धा नाही. खूप मोठा आहे खूप मोठा खूपच मोठा आहे. आम्ही शनिवारी एक ६०० किलोमीटर (अमेरिकेत माईल म्हणतात ) गेलो , तर १३० किलोमीटर सरळ रस्ता मग एक गाव तिकडे एक वळण मग परत १०६ किलोमीटर सरळ रस्ता ... पण हायवे सिंगल लेन अमेरिके सारखं सुसाट आणि मोठ्याला हायवे नाही . सगळं आकाश दिसतं नजर जाईल तोवर शेत जमीन डोंगर नाही सपाट  सगळं सपाट नो घाट , वेग ११०, जास्त नाही (गुगल मॅप्स  वर सगळं नीळ अजिबात लाल नाही कि नारंगी नाही, ६०० किलोमीटर नो ट्राफिक म्हणजे विचार करा काय असेल दृश्य, मी बाहेरचं दृश्य सोडून सारखा मॅप बघत होतो)


आमचं विमान सिडनीला   उतरलं , भारत सोडला कि सगळंच स्वच्छ असतं , तसंच होतं , देश बेताचा श्रीमंत आहे, म्हणजे बघा तुम्ही जर्मनी किव्हा झुरिकला उतरलात कि एकदम रिच वाटतं सगळं, US ला पण तसंच जाणवतं बऱ्याच एअरपोर्ट वर , पण सिडनी त्या पेक्षा कमी वाटली श्रीमंतीत पण आपल्या पेक्षा किव्हा मेक्सिको पेक्षा बऱ्या पैकी श्रीमंत. मला वाटलं मोठं आहे शहर म्हणजे एअरपोर्ट पण मोठा असेल, तर अगदीच लहान निघाला. हि लोकं मात्र सहा फूट - लांबीने आणि रुंदीने पण. 

टॅक्सी वाला आशियातला होता, अजून मला एक पण गोरा किव्हा लोकल टॅक्सी वाला इथे किव्हा अमेरिकेत काय लंडन ला तरी दिसला नाहीये (म्हणजे आपण मुंबईकर श्रीमंत आहोत हे लक्षात घ्या , कारण इथे सगळे बाहेरचेच असतात उबर वाले). हॉटेलात बॅगा टाकून (आणि अंघोळ करून) आम्ही सिडनी मध्ये लिट्ल इंडिया ला जेवायला गेलो. आमच्या हापिसातला एक जपान ला असतो त्याला इंडियन फूडच कौतुक आहे , मला बाहेर गेलं कि नसतं कौतुक, एक तर ते नावाला इंडियन असतं बाकी  सगळं गम्मत जम्मत. आहो पण सांगायचं म्हणजे जेवढे foreigners मुंबईत दिसतात तेव्हडेच तिथे होते बाकी सगळे आपली माणसं (जेवण बरं होतं ) हॉटेल पंजाबी जिलबी खाल्ली तो पंजाबी गुजराती पान वाला आणि एक दुकानदार गुजराती (इंग्लिश पण अगदी गुजरात मधलंच). फक्त एक मोठा फरक म्हणजे .... अगदी बरोबर ...... स्वछता.

जाता येता उबर वाला चाइनीस होता अबोल होता , भारतीय किव्हा पाकिस्तानी असले कि खूप बोलतात (दोघां मधला फरक सांगितल्या शिवाय सांगता येत नाही ). 

नशिबाने रात्री फार जेट ल्याग नाही जाणवला, ५:३० तास पुढे आहे सिडनी पर्थ अडीच तास. हॉटेलात अमेरिकन बेकफास्ट होता , इथे आलो कि दोन चार वर्षाचा मैदा पोटात साठवून जातो मी नेहमी (काय ते कौतुक मैद्याचं नाही कळलं मला ).

सिडनी मोठं शहर आहे (राजधानी कॅनबेरा आहे ) मोजकी दोन तीन मोठी शहरं आहेत त्यात बऱ्यापैकी असलेलं शहर म्हणजे सिडनी.  इथे ऑपेरा हाऊस आणि हारबर ब्रिज फेमस आहेत. सकाळी पंजाबी माणसाची उबर करून आम्ही त्या ऑपेरा हौस ला पोचलो. ऑस्ट्रेलियन डे पण २६ जानेवारी ला असतो त्या मुळे तिथे वर्दळ होती, पोलीस होते छान होतं वातावरण जल्लोष वगैरे न्हवता पण फेस्टिव्ह होतं अजिबात ढणा ढणा म्युझिक नाही काही नाही. शांत होतं सगळं पण रैलचैल होती.

ऑपेरा हाऊस फोटोत दिसतो तितका पांढरा शुभ्र नाहीये, त्यावर दिवे लावून रंग उतरला आहे म्हणतात. जगातली सगळी मोठी शहरं समुद्र किनारी आहेत अमेरिकेतली दोन , लंडन , मुंबई आणि बरेच तसंच सिडनी. इथे पॅसिफिक समुद्र आहे , पाणी तसंच दिसतं म्हणा. छान आहे परिसर खूप बोटी वगैरे दिसतात , शेजारी मोठं गार्डन आहे , लोकं धावत वैगेरे होती. सहज आठवलं म्हणून सांगतो , आम्ही आयफेल टॉवर पाहायला जात असताना लोकं तिथे जॉगिंग करत होती, तसंच काहीसं वाटलं , मोठी आहे वास्तू हि पण सुंदर आहे gaudy नाहीये, तिथून आजूबाजूला दृश्य पण छान आहे, समोर तो ब्रिज दिसतो हारबर ब्रिज, मोठा लोखंडी आहे त्यावर ट्रेन पण जाते गाडी पण आणि माणसांना वर जाण्याकरता एक टूर आहे, खालून वर जाऊन यायचं असतं ४०० मीटर आहे चढाई , आम्ही नाही गेलो, ३५०$ वगैरे आहे आणि वेळ पण खूप जातो, आमच्या कडे २ तास होते फक्त .

मी फार  त्यांच्या स्वछ्तेचं  कौतुक करतो म्हणा  , पण त्या ऑपेरा हौस च्या शेजारी समुद्र इतका साफ आहे कि, तिथून तळ दिसतो, आता बोला ? म्हणजे हे शक्य आहे. 

आम्ही मग नुसतं फिरलो आजूबाजूला त्या टुरिस्ट बस मध्ये छ्क्कर मारली छोटी छान ट्राम पहिली कॉफी प्यायलो. त्या दिवशी छोटी जत्रा होती तिथे रस्त्या वर लोकं काय काय विकत होते एक माणूस saxaphone वाजवत होता , मस्त प्रसन्न होतं वरण. त्या दिवशी एअर फोर्स ची मोठ्या आवाजाची विमानं उडत होती , भारतात नाही पाहिलं कधी मी , पण तिथे पाहायला मिळाली.

तिथून हॉटेल ला येताना एक वयस्कर चायनीज उबर वाला भेटला  इंग्लिश चांगलं होतं, हाँग काँग का? आमच्यातल्या एका ने विचारलं , नाही म्हंटला साऊथ आफ्रिका ... आमचं आश्चर्य खूप बोलकं होतं , हास हसत म्हणाला , माझी मुलगी असते चार वर्षां पूर्वी नातवंड सांभाळायला आलो .... जग भर जावा बाप तो बाप असतो आणि नातवंडांची जवाबदारी चायनीस असो का भारतीय अमेरिका असो का आफ्रिका का ऑस्ट्रेलिया ....बरोबर ना? कौतूक ह्या करता कि ७० ओलांडलेला म्हातारा नुसता घरी न बसता अजून मुलीच्या पैश्यां वर अवलंबून न्हवता , कष्टकरी काम करी वर्ग.

आम्ही सिडनी वरून निघून पार्कस नावाच्या गावी जायला निघालो ... ऑस्टेलियन गावा बद्दल लिहेन पुढे.






सागर 

फेब्रुवारी २०२६







 






Saturday, May 24, 2025

शेरगाव - अरुणाचल प्रदेश

शेरगाव - अरुणाचल प्रदेश  

मार्च मध्ये मी अरुणाचल मध्ये चार दिवस फिरलो, मी पहिल्याल्या  पैकी अगदी वरचा नम्बर लागेल अशी हि जागा आहे, बर्फ रस्ते धुकं पाणी दऱ्या घरं आणि लोकं ... लोकं , मी मेघालय पाहिलं, खूप सुंदर पण लोक एकदम विचित्र वाटली धड उत्तर नाही इंग्लिशचा  अट्टाहास , त्या पेक्षा कैक पटीने मला अरुणाचल सुंदर वाटलं आणि लोक हिंदी बोलतात , पण मी आज फक्त शेरगाव नावाच्या एका जागे बद्दल लिहणार आहे, बाकीचं तुम्हाला सगळे सांगतील पण ह्या गावाचा उल्लेख फार कमी मिळेल जास्त लोकं नाही त्या मुळे पण हे गाव सुंदर राहिलंअसेल. 

आम्ही खरं तर तिथे जाणार न्हावतोच पण वाटेत धुकं लागलं म्हणून रस्ता वाकडा करून  तिथे गेलो , तुम्ही कधी गेलात तर बोमडिला वरून खाली येताना उजवीकडे जायला  तुम्हाला एक बोर्ड दिसेल तो घ्या , तो रस्ताच सुंदर आहे , नाग मोडी वळणं , वाटेत खूप ठिकाणी तुम्हाला मिलिटरी ची पोस्ट लागेल पण  अरुणाचल प्रदेश  मध्ये सगळी कडेच आहे ते. आर्मी जास्त लोकं कमी. 

असं सुंदर वाटेतून जात असताना अचानक गूगल म्हंटल आलात शेरगाव ला , आम्ही जवळ असलेलं एक हॉटेल पाहिलं , छान होतं , नदी वाहत होती, समोर डोंगर आणि रूम पण एकदम टकाटक म्हणजे थोडं जास्तच चांगलं होतं, किंमत पण जास्तच होती, आम्ही नाही घेतलं कारण सकाळी लवकर निघायचं होतं. पण एखादा दिवस असेल फॅमिली असेल तर नक्की राहा , मी नी मित्रच होतो उगाच ५००० का द्या असं झालं ? लगेच पुढे एक होम स्टे सारखं मिळालंच आणि नंतर कळलं कि खूप आहेत हॉटेल्स आणि महागातली पण आहेत. 

हे गाव फार तर शे दोनशे मीटर आहे,  तुम्ही आंबोलीला गेला असाल तर तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. गाव असं सुरु होत आणि समप्तं पण निसर्गाने भरभरून दिलंय,  खूप दिलंय म्हणून माणसं पण आनंदी आहेत (आता काश्मीर बघितलं कि कळतं कि निसर्ग आणि आनंदी माणूस हे समीकरण सगळीकडे लागू होत नाही म्हणा). आम्ही असच चक्कर मारायला गेलो आणि एक सुंदर झरा लागला पुढे कुठे तरी धबधबा आहे असं गूगल म्हणाला , पण ना इथे ५ ला अंधार बुडुक होतो म्हणून आम्हाला पाहता नई आला. रस्ता सुंदर, नो गर्दी ,  छोटे खानी गाव १५-२० दुकानं (त्यात दारूची दोन), हॉटेल्स, काही भाजी विकायला,  काही केक शॉप अशी दुकानं आलेत  . एक बाई मोमो आणि चहा विकत होती, थोडा पाऊस पडत होता म्हणून आम्ही थांबलो आणि मोमो घेतले एक प्लेट तिने १० दिले ५० ला आणि छान भरलेले चवीला अप्रतिम . ती बाई काय आनंदी होती ... आता त्या गावात किती कमावणारे ती? पण बाई हसत मुख. मला वाटतं रस्त्या च्या पाठी डोंगरात लोकं राहत असणार पण तेच ५०० ते ७००.  शाळा पण होती , मला शाळेत जाणारी लहान मुलं फार आवडतात हि इथली पोरं पण जाम गोड दिसतात , पुढल्या खेपेस राहीन एक दिवस अजून. 

थंडी बेताची होती , बेताची म्हणतोय कारण आम्ही तवांगला बर्फातुन आलो होतो, पण छान होतं सगळं , वर आकाश पाहिलं तर सगळॆ तारे दिसले.  मुंबईत आकाश दिसतच नाही म्हणून एकदम एवढं मोकळं आकाश पाहायची सवय गेलीये , पण फार सुंदर होतं. जेवायला उत्तम मिळालं आणि स्वस्त फार , घरगुती असल्या मुळे फार मसाले नाही काही नाही . परत आग्रह पण केला त्यांनी . एकूणच नॉर्थ इस्ट ला मसाले कमी वापरतात , नॉर्थ ला भडीमार असतो तसा इथे नसतो. 

सकाळी वॉल्क ला गेलो तेव्हा वर्ष भराचं oxygen घेऊन आलो , इतकी रम्य सकाळ मी क्वचित पहिली असेन , खूप प्रसन्न,  पाऊस न्हवता,  निरभ्र आकाश, छान पाणी वाहतंय,  शेजारी डोंगर वाहन नाही गर्दी नाही हॉर्न नाही सगळं स्वच्छ , त्या ५०० लोकांच्या गावात सुद्धा एक दोन लोकं मला सकाळी धावताना दिसली ... बरं वाटलं  मला , अहो इतकं शांत गाव कि  कुत्री सुद्धा मागे नाही लागली बाहेरचा माणूस पाहून... दोन आर्मीचे ट्र्क मात्र दिसले मला. सकाळच्या उजेडात एका समजलं कि गाव फक्त टुरिस्टवरच चालतं बहुतेक,  खूप हॉटेल्स होती, सगळ्यात जुनी मोनेस्टरी आहे असं तो माणूस म्हणाला , हे असं सगळेच म्हणतात . पण छान फील गुड वाल गावं वाटलं. 

ज्या माणसा कडे आम्ही राहिलो होतो तो सरपंच होता, त्या मुळे दोन गाड्या वगैरे होत्या , सधन वाटलं गाव तसं काय करतात कुणास ठाऊक, सकाळ ७ लाच निघालो आम्ही, चहा दिला त्या बाईने, पैसे वगैरे नको म्हंटली चहा चे , नाश्ता करून जा म्हणाली पण आमहाला गुवाहाटी ला जायचं होतं म्हणून आम्ही तसेच निघालो. फार हाव दिसली नाही म्हणून जास्त बरं वाटलं, त्याने कार्ड पण दिलं परत नक्की या असा आग्रह पण केला :). रात्री थोड्या गप्पा काय मारल्या आम्ही तर एकदम मित्र सारखा झाला , मुलांची अतिशय कठीण नावं सांगितली , मला तेव्हाच लक्षात नाही राहिली. 

जाताना एक ५० किलोमीटर सुंदर रस्ता आहे , कधी गेलात तर अवश्य जा ... 



त्या गावाला सगळ्यात जवळचं  मोठं ठिकाण  म्हणजे बोमडिला अडीच तीन  तासा वर, आपल्याला लहानच वाटेल. गुवाहाटी ७ तास स्वतःची गाडी असेल तर  , बाकी मला काही ST वगैर दिसली नाही , ह्या लोकांनां कुठेच जायचं नसतं , केवढी happy वाटली, मेजर हॉस्पिटल नाही जवळ पास , डॉक्टर चा बोर्ड पण नाही पहिला गावात,  केमिस्ट नाही आता आर्मी चा तळ जवळ असल्या मुळे तो एक मोठा फायदा आहे म्हणा , पण बाकी छान होतं आयुष्य त्यांचं ... केबल होता घरी त्या माणसाच्या . आता मोबाईल मुळे इंटरनेट पण हाताशी आलय म्हणा.  पण बाकी आपली हि वण वण ओढाताण सगळं व्यर्थ वाटतं कधी कधी . .. चार दिवस इथे नुसतं राहिलो आपण तरी फ्रेश होऊन जाऊ ... फार लांब आहे जागा नाहीतर गेलोच असतो ...पण जाऊन राहणारे मी  अजून एकदा ...  












Saturday, November 16, 2024

आसाम - मेघालय - 2

 आमचा पुढचा चेरापुंजी ला होता असेच खूप तास वाटेत काही गुहा लागणार होत्या आणि मग एक मोठा धबधबा आणि नन्तर तो रूट ब्रिज आणि भारतातलं सगळ्यात स्वच्छ गाव आणि पारदर्शक नदी ... आणि हे पाहायला आमची बस त्या रस्त्या वरून धूम निघाली ... 

मेघालय मध्ये खासी आणि जारो ह्या मातृभाषा आहेत आणि असतील तर मला आता आठवत नाही, पण तिकडली लोकल लोकं आमच्या भाषा हि भाषा बोलतो असं म्हंटले, आपल्याला काहीच कळत नाही अजिबात म्हणजे अजिबात नाही असामी तरी बंगाली सारखी आहे त्या मुळे ती थोडी उमगते. त्या मुळे इथे नाव खूप विचित्र आहेत असं जाणवलं . नीट उचारता हि येत नाहीत. थोडं फार तुटक मुटकं इंग्रजी बोलतात (हिंदी वर राग आहे ते  नन्तर सांगतो). 


मेघालय राज्य सगळं घाट रस्त्याचं आहे , बहुतेक वेडी वाकडी वळणं आणि रस्ता सगळा छोटा आहे. मोठ्याला हाई वे नाहीच म्हणा. आम्ही शिलॉंगला फक्त तो धबधबा पहिला आणि निघालो वाटेत दोन चार गोष्टी पाहणार होतो पण त्या ड्रायव्हर ने आम्हाला पटवून दिलं कि आता त्या स्पॉट ला काही नाही आणि तुमचा अजून एक स्पॉट राहून जाईल तो जास्त छान आहे (पटलं आम्हाला). वाटेत एक मोठी दरी लागली खूप खोल , खोलच खोल , Dympep Valley असं नाव होतं  मला उंचीची भीती आहे एकूणच म्हणून मी दुरून ती दरी पहिली. टुरिस्ट स्पॉट होता तो,  तिथे मॅगी चे ऑम्लेट चे स्टॉल होते, दरी च्या शेजारी, लोकांना दरीत  कमी आणि मॅगीत जास्त इंटरेस्ट दिसला. छान हिरवी गार होती दरी आणि खाली ते सगळे जीव घेणे स्पोर्ट्स पण होते, मी दोन चार फोटो काढून (मॅगी ऑम्लेट काहीही न खाता  निघालो. 

शिलॉंग ला सुद्धा त्या हॉटेलात चहा न्हवते देत  हॉटेल थोडं गाव बाहेर होतं म्हणून टपरी पण न्हवती  आजूबाजूला , तो खानसाम्या म्हणाला नाष्टा और चाय एक साथ देता है, काय  तरी वेड्या सारखं, चहा दे म्हणालो मग नाश्ता दे नाहीतर मी हिंस्त्र  होतो चहा नाही मिळाला कि , ऑम्लेट आणि आलू पराठाच  दिला म्हणा .


सगळं स्वच्छ आणि कचरापेटी पण बांबूची 

गर्द झाडी 
खूप सारा प्रवास करून आम्ही एक गुहा बघायला आलो, Arwah lumshynna Cave  असं एकदम कठीण नाव असलेल्या गुहा होत्या जास्त मोठी गुहा नाहीये असं वाटलं मला, पण मग कळलं कि लोकांना जाण्या करता एकच छोटी गुहा खुली केली आहे, बाकी सगळ्या बंद. कुणी केल्या असतील त्या? का नॅचरल आहेत? कोण राहत असेल? सगळं अजब आहे. आजूबाजूचा परिसर मात्र खूप छान हिरवा गार होता. मेघालय मध्ये एक जाणवलं म्हणजे इथे बाथरूम स्वच्छ आहेत सगळे आणि कुठे हि लोकांनी थुंकून वैगेरे नाही ठेवलं गुहा आहेत पण घाण वास नाही कुठे आणि आम्ही गेलो तेव्हा फार गर्दी पण न्हवती, गोंगाट नाही. 


आम्ही तिथून मग एक वॉटरफॉल बघायला निघालो नोहाकालीकाय का असं कायतरी नाव होतं , ११०० फूट इतका उंच धबधबा आहे असं म्हणाला ड्राइवर पण आम्हाला नॉशिनगीठीयान्ग ह्या अश्या किचकट नावाच्या ठिकाणी घेऊन गेला. 

गुहा, त्यात दिवे लावले आहेत 
वाटेत एक छानसं प्रसिद्ध व्हेज रेस्टॉरंट होतं पण आमच्यातला एक बंगाली मुलगा हटून बसला कि मला चिकन "चं " हवंय , मग दोघे म्हणले कि नॉनव्हेज असेल तर बेटर , एक जैन होती मुलगी पण तिचा नवरा बाहेर आला कि सगळं खायचा म्हणून त्यांना फार फरक न्हवता पडत, मी असं पण चिकन खात नाही दुसरी पंजाबी होती पण बऱ्या पैकी शाकाहारी होती आणि बाहेर व्हेज बरं वाली, तिनेच सुचवलं ते वर्ल्ड फेमस व्हेज  रेस्टॉरंट . पण ते बंगाली पेटलंच आणि लालफीत बांधून विद्रोहच केला . (तरी सकाळी चार आम्लेट आणि थांबलो तिथे अंडा मॅगी खाल्लं होतं), कुठे फार येत न्हवतं ते, गुहा पण नको म्हंटलं क्या देखना उसमे ? असं केलन... मग आम्ही त्या टुरिस्ट स्पॉट ला जाऊन डाळभात खाल्ला आणि त्या लोकांनी दोन चार नॉन व्हेज डीशेस घेतल्या आणि किती बेकार होतं म्हणून आता रात्री मात्र छान चिकन खाऊ म्हणाले. माझ्याच पोटात गोळा आला. हे अनोळखी  लोकांना घेऊन जाण्याचं जोखीम वाटलं मला, बाहेर गेल्यावर माझा भर पाय चालवण्यात जास्त असतो पोट नाही . थोडं लोकल खातो म्हणा पण बघणं जास्त पसंद करतो, पण असेही अनुभव मोलाचे . त्या जैन मुलीचं एकदा खूप पोट बिघडलं , पनीर खाल्लं तिने चेरापुंजी ला कुठे तरी, त्यावर ताक . उगीच कुठे हि काहीही खाऊ नये माणसाने ... 

नॉशिनगीठीयान्ग मध्ये धबधबा छोटा झाला होता, हल्ली चेरापुंजी ला पण पाऊस कमी पडतो, आधी वर्ष भर पडायचा आता तसं होत नाही, त्या मुळे दरी मोठी असली तरी पाण्याची धार लहान होती, पण पाऊस असल्यावर बघायला नक्कीच भारी वाटत असेल. 



तिथून निघून परत केले छोट्या गुहा आहेत तिथे आम्ही गेलो , हि रस्तयात होती,  म्हणजे गावात छोटी असली तरी इंटरेस्टिंग होती. दहा वीस वगैरे तिकीट असेल, पण तो तिकीट घेणारा खूप जास्त उद्धट होता उगाच खेकसत होता, त्याला फार टुरिस्ट लोकं पसंत न्हवती , मला एकूणच हि लोकं रुड वाटली आणि हिंदी नाही येत म्हणणारे , इंग्रजी ची बोंब. फार टुरिस्ट फ्रेंडली नाहीयेत हि लोकं किव्हा प्रोफेशनल नाहीयेत. 

आमचा मुक्काम होता त्या ठिकाणी कारण दुसऱ्या दिवशी लवकर आम्हाला "नोंग्रीयात ट्रेक" ला जायचं होतं ते वर्ल्ड फेमस रूट ब्रिज वालं ठिकाण. तिथल्या स्थानिक लोकांनी झाडांच्या मुळा पासून ब्रिज बांधला आहे त्याला शे दोनशे वर्ष लागली असणारे आणि जितका जुना होत जातो तितकाच तो मजबूत होत जातो.  तो बघायला साधारण ५००० हजार पायऱ्या वगैरे जायच्या होत्या. 

ड्रॉयव्हर खूप टाइम पास करत आम्हाला हॉटेल ला घेऊन गेला. मी डबल शेरिंग ला होतो , माझ्या बरोबरचा मुलगा २६ एक वर्षांचा असेल. अजिबात सोइ नसलेलं हॉटेल होतं ते पाणी मागितलं तर म्हणाले घेऊन या जाऊन आणि जवळ पास काही नाही , सगळी दुकानं अगदी हॉटेल पण सहा ला बंद फार तर सात. माझ्या वयाची पंजाबी बाई होती , पूर्वा नाव तिचं ती तर खूप चिडली, कारण तिची स्पेशल म्हणून दिलेली रूम तर अंडा सेल सारखी होती नुसती एक खाट आणि भिंत , तशी सधन घरातली आहे ती. ती ड्राइव्हर ला घेऊन गावात गेली अब हाटेल शोधून आली अडीच हजार रेट होता पण चांगलंय म्हणाली , कल सुबह जल्दी निकलना है , खरं होतं.  न खाता पिता कसं जायचं आणि चहा पण नाही मिळणार हे कळल्यावर मी जरा गडबडलो, चहा सोडा पाणी पण नाही हो देत ती लोकं . एक विचित्र वास येत होता , ते डास मारतात तो फवारा मारला होता सगळी कडे , माझ्या रूम मेट नि मला कन्व्हिन्स केलं कि आपण वाटून घेऊ आणि शिफ्ट होऊ, मी पण जाऊन बुक केली रूम आणि हे पालटलं गडी. पण मी घेतली तरी एकट्याने (एक बार कमिट करदिया तो में ...  ) आणि सगळ्यात उत्तम निर्णय होता तो . तिथे आम्हाला छान जेवण (चहा ), सकाळी ब्रेक फास्ट बांधून , मोठ्या स्वच्छ खोल्या , आत गरम पाण्याची पिशवी (ती का लागेल ते मला नंतर समजलं ) हवं तेवढं पाणी आणि प्रसन्न होतं सगळं. 

खूप गमतीची गोष्ट म्हणजे इथे रविवारी दारू विक्री बंद असते म्हणजे दुकानं बंद असतात दर रविवारी ... 

तिकडे  मॅनेजर होता एक जॉन्सन नावाचा त्याला हिंदी पण बोलता येत होतं आणि इंग्रजी सुद्धा उत्तम होतं , त्याने आम्हाला सगळी छान माहिती दिली, सकाळी लवकर जा म्हणाला म्हणजे दुपारी त्रास होणार नाही येताना . दोन ब्रिज आहेत म्हणाला एक अगदीच लगेच आहे तो जास्त छान आहे आणि तो जाताना करा येताना त्राण नसेल २०० पावलं चालायचा , दुसरा आहे ब्रिज तो साधा आहे आणि तिसरं म्हणजे रेनबो फॉल्स पर्यंत जाऊन या ते तेवढंच पुढे आहे पण खूप अप्रतिम आहे. परिसर खूप छान आहे. ड्रायव्हर आणि गाडी दिली तिथे गाईड चा नम्बर दिला आणि ड्रायव्हर ला सांगितलं कि तू गाईड ला फोन करून भेट करून दे आणि मग जा. सकाळी आम्हाला त्याने उकडलेली अंडी दोन सँडविच एक केळ बांधून दिलं. 





सकाळी सात साडे सात ला आम्ही हॉटेल हुन त्या नोंग्रीयात ला पोचलो , सडसडीत बांध्याचा एक माणूस आम्हाला गाईड म्हणून दिला होता, त्याचं घर तिथेच होतं , फार तर शे दीडशे लोकांची वस्ती असेल . साधारण ५ ते ६ किलोमीटर चा प्रवास असेल आणि त्यात ह्या हजारो पायऱ्या. आम्ही त्या पायऱ्या उतरलो आणि पहिल्या ब्रिज जवळ गेलो , नदीच्या वरती आहे तो, पाणी कमी होतं पण कमाल आहे हि लोकं निसर्गाशी किती एकरूप होऊन जगतात (आता मोबाईल ने अतिक्रमण केलंय म्हणा). काय सुंदर होतं सगळं.  निरव शांतता होती खूप पक्ष्यांचे आवाज थोडं पाणी वाहत होतं निरभ्र आकाश सकाळची कोवळी उन्ह गर्द झाडी ... १००% ऑक्सिजन . तो ब्रिज पाहून (आणि मनोमन जॉन्सन चे आभार मानून )आम्ही परत दुसरा मोठा ब्रिज पाहायला निघालो, वाटेत अनेक वेळा पायऱ्या लागतात आणि रस्ता पण पाय वाटीचाच आहे. लहान मुलं आणि मुली अधिक , शाळेला चालले होते आणि त्यांचे आई बाप आजोबा त्या पोरांना गडबडीने सोडायला जात होते, आमच्या गाईड (लूमलांग) ला मी विचारलं कि शाळा कुठे? तो म्हणाला वरती में रस्त्याला . म्हणजे हि लोकं रोज हजारो पायऱ्या चढून आणि उतरून जातात आणि पाऊस पडला (जो नेहमीच पडतो)तर त्यात ह्या अश्या पायऱ्या वरून ये जा ... धन्य आहे म्हणालो. ती लहान पोर पोरी लहान पोर पोरीनं सारखेच हसत बागडत जात होती , सगळं गाव सडसडीत . आणि अजून आत आत पण गावं आहेत म्हणाला थेट पर्यंत आणि मध्ये मध्ये डोंगर दर्यात पण लोकं राहतात , ती लोकं वेगळ्या रस्त्या ने ये जा करतात. अजून किती रस्ते आणि गावं होती कोण जाणे? काही गावं आम्ही टुरिस्ट लोकांना दाखवत नाही म्हणाला . लोकं खूप घाण करतात. लाज वाटली मला आपल्या लोकांची. 

आम्ही सकाळी आठला तो ब्रिज पाहून पूढे जात असताना एक फिरंग बाई आणि बुआ दिसले आम्हाला येताना . ती बाई पण गाईड आहे असं लूमलंग म्हणाला , म्हणजे ती लोक पहाटे चार ला वगैरे निघाले असणारेत अंधारात ह्या जंगलात. काय साहसी असेल ती बाई आणि बुवा पण,   त्याला संध्याकाळचं flight होतं म्हणून सकाळी ९ पर्यंत निघायचं होतं म्हणून हा अट्टहास. ह्या पेक्षा अजब म्हणजे आम्ही अडीच ला परत येत असताना ती बाई आम्हाला अर्ध्या वाटेत परत कुणाला तरी घेऊन जाताना दिसली ... पायच धरणार होतो मी पण वाकायची ताकत न्हवती माझ्यात .  


दोन एक किलोमीटर उबडखाबड रस्त्यावरून गेल्यावर आम्हाला तो वर्ल्ड फेमस फोटोत दिसणारा ब्रिज दिसला खाली थोडं पाणी वाहतं आणि शेजारी दोन दुकानं आहेत नाश्ता पाणी , आम्ही थोडं खाल्लं त्यांना पण दोन पैसे मिळू देत म्हंटल , लूमलांग चे ओळखी चे होते (असणारच )त्याला पण बरं वाटलं. तिथून अजून खूप अंतर जायचं होतं आम्हाला ते रेनबो फॉल्स बघायला. पूर्वा ला विचारलं त्याने कि जाऊया का थोडं कठीण आहे, जाऊ म्हंटली , फार तर तुला चार लोकानां बोलवावं लागेल मी अडकली तर . गेली पन्नास वर्ष कथक करते ती, त्या मुळे पायाची चामडी नाजूक झाली असते म्हणाली आणि रोज नाच शिकवते, पण म्हणून जमलं तिला सगळं जाऊन यायला. येताना त्याच ठिकाणी थांबून मॅगी खाल्ली मी आणि बांधून आणलेलं अंड एक अगदी उपाशी असलेल्या कुत्री ला दिली. तिथें एक मांजर पण होती छोटी होती अगदी पिल्लू पण कसली दांडगट होती , माणूस आला कि कुत्रा मांजरी आल्याच हो.  
पुढला प्रवास खूप सुंदर रस्त्यातून पण थोडा खडतर होता चिंचोळा रस्ता होता आणि एकी कडे थोडी दरी होती, पण झाडं होती खूप मध्ये म्हणून खालचं काही दिसत न्हवतं. लूमलांग पूर्वा बरोबर येत होता आणि मी थोडा पुढे पुढे जात होतो , मी फास्ट आहे म्हणून नाही खरं तर पण तो निसर्ग मला एकट्याला पाहायचा होता. वाटेत एक छोटं दुकान होतं तेच पॅकेजड फूड आणि मॅगी विकणारा. लगेच लूमलांग ने विडी ओढून घेतली. हि लोकं तंबाखू खात नसले तरी सिगारेटी फार ओढतात. तरी बऱ्यापैकी चढतात आणि उतरतात. 




खूप अंतर कापल्यानंतर मग तो रेनबो फॉल दिसला, अभूतपूर्व आहे निसर्ग तिथला आणि माही लवकर गेलो म्हणून कुणीच न्हवतं , उगम होता नदीचा किती तरी वेळ बसलो होतो आम्ही पाण्यात पाय टाकून एवढं गेलो ते सार्थक झालं. 



परतीचा प्रवास नेहमीच बिकट असतो. उन्ह पण वाढलं होतं सकाळीच निघालो होतो पण नशिबाने नीट आलो , येताना त्या हजारहून अधिक पायऱ्या होत्या त्या थोड्या त्रास दायक झाल्या खऱ्या पण निभावलं. वाटेत येताना लहान लहान मुली अननस विकत होत्या एकदम गोबरु  गोंडस. त्या ड्रायव्हर ला फोन केला आणि आलो परत आम्ही  . संध्याकाळी आम्ही ते जे व्हेज हॉटेल मिस केलं होतं ना? त्यात जेवलो इथे पण आहे ब्रांच देवा नाव आहे त्याचं एकदम पॉश आणि लै महाग आहे राहायला दहा हजार वैगेरे आहेत एका दिवसाचे जेवण महाग न्हवतं आणि बरं होतं. 


नन्तर चा प्रवास भारतातल्या सगळ्यात स्वच्छ अश्या गावाचा होता आणि पारदर्शक पाण्यातल्या होडीचा ... 
सांगतो हळू हळू पुढे . 













Tuesday, November 12, 2024

आसाम - मेघालय - 1

आसाम - मेघालय  - फेब २०२४

मी इतक्या वर्षात कधीही सोलो ट्रिप केली नाही ... म्हणजे बहुतेक सगळ्याच ट्रिपा सोलो होत्या पण एकट्यानेच केलेल्या,  असं कुणी अनोळखी माणसां बरोबर नाही. 

खूप confusion, ते आधी clear करतो. मी थोडा यूरोप फिरलोय, US  थोडा भटकलोय, नाही म्हणायला गयाना   मेक्सिको वगैरे आणि भारतात थोडं फार पाहून घेतलाय , पण ते बहुदा कामा निमित्त. वेळ काढून एकटाच, तसा सोलो,  पण  ... चला ट्रिप ला जाऊ,  असं नाही केलं कधी , म्हणून ह्या वेळेला असं ठरवून गेलो सोलो करूया म्हणून.  खरं तर मी भूतान करणार होतो, (खूप वर्ष मला करायचं आहे ते ) त्याच्या शोधात असताना एक  नॉर्थ ईस्ट ची दिसली मला माहिती, त्यांना विचारायला फोन केला भूतान तर त्याने मला हि आसाम वगैरे सांगितलं , मी भूतान ची पण माहिती घेतली पण काय माहित मी हि काझीरंगा - मेघालय टूर बुक केली. म्हणजे बघा तुम्हाला कधीतरी डेरिंग वाली गोष्ट करायची असेल , वरून पाण्यात उडी, किव्हा बंजी जम्पिंग किव्हा तत्सम काही,  खूप विचार केलात तर होत नाही ना ? तसं . मी दहा मिनटात फार विचार न करता पैसे भरून टाकले. 

thrilophilia नावाची एक कम्पनी आहे त्यांची आसाम - काझीरंगा - शिलॉंग - चेरापुंजी - मावलीनॉन्ग , अशी टूर मद्ये मी फार कुणाला ना विचारता उडी घेतली  (नाही म्हणायला एका मैत्रिणीशी बोलून बघितलं जुजबी कारण ती फार अश्या ट्रिपा करते, साफ उडवून लावलं तिने मला आणि जा काही होत नाही घाबरतो कशाला? असं म्हंटल्यावर मी कसा नाही म्हणणार ?. आशीर्वाद ते म्हंटल)

पहाटे ६ च्या विमानाने मी गुवाहाटी ला गेलो, म्हणजे अघोऱ्या वेळी उठून टॅक्सी पकडून जावं लागलं (तीन तास आधीच जाऊ म्हणून निघालो ते बरं केलं कारण  अडीच - तीन  ला पण मुंबई बिझी होती ).  सहा हे सांगितलं कारण साधारण सडे आठ - नवाला विमान  आसाम जवळ जात असताना मला हिमालय दिसला , मी खिडकीत न्हवतो पण तरी मान वाकडी करून बघितला .  खूप वेळ हिमालय दिसतो आणि सकाळ सकाळ सूर्यकिरण पडलेली असतात , लोक जीव टाकून टाकून का जातात हिमालय चढायला हे कळलं , विमानातून डोंगर दिसावा? हा असा इतका मोठा डोंगर? त्या दहा मिनिटाच्या विलोभनीय दृश्याने रात्री च जागरण प्रवास सगळं विसरायला लावलं, गेलात कधी कि अगदी आवर्जून पहा, खिडकी ची सीट घेऊन. (हिमालयाचं सकाळचं देखणं रूप,  रंगून सांगण्या इतपत  माझ्या कडे शब्द सामर्थ्य, अजून तरी नाही,)  माझ्या रांगेतला खिडकी वाला गाढ झोपला होता, देव देतो आणि कर्म नेतं त्यातला प्रकार. हे मला सगळ्या टूर मध्ये फार जाणवलं म्हणून मुद्दाम सांगितलं. 

टूर ला जाण्याआधी एक व्हाट्सअप ग्रुप केला होता, मीच एकटा मराठी होतो. अजून सात जण होती, आम्हाला फक्त ड्राइव्हर आणि गाडी दिली होती आणि एक ढोबळ आराखडा, बाकी तुमचं तुम्ही पाहा आणि या असा तो प्लान होता. माझं विमान वेळेवर पोचलं पण बाकीची विमान थोडी अडकली त्या मुळे दहा च्या ऐवजी आम्ही ३ ला निघालॊ आणि डायरेक्ट काझीरंगा रात्री १० ला गाठलं. दुपारी एका हॉटेलात व्हेज थाळी खाल्ली (बरं होतं जेवण). भात हवा तेवढा देतात बाकी बटाटा होता डाळ होती पण करण्याची पद्धत वेगळी होती, एकूण जेवणाचे आबाळ होणार नाहीत हे लक्षात आलं. इतरांनी चिकन वगैरे घेतलं, मी येताना मासा खाऊ म्हंटल, प्रवास सुरु होणार होता आपला डाळ भात बरा. 

तुम्ही कधी त्या भागात गेला असाल तर कळेल कि साडेचार पाच ला अंधार होतो, म्हणून आम्ही गाडीत बसलो आणि थोड्याच वेळात अंधार पडला, आम्हाला जायला तीन चार तास लागणार होते त्या मुळे बराच प्रवास अंधारात झाला, चहाला थांबलो म्हणा एकदा (चहा उत्तम मिळतो इथे) आणि पोचायच्या आधी जेवलो. रस्त्याची खूपकामं  सुरु होती त्या मुळे ट्राफिक पण लागला. भारतात कुठेही प्रवास करा साधारण तसंच दिसतं खिडकी बाहेर तशिच छोटी गावं , बाजारपेठ , छोटीखानी हॉटेल, लोकं , पुढार्यांचे पोस्टर्स .. अगदी तसंच होतं , पण हिरवं आहे सगळीकडे. काझीरंगा पोचायला उशीर झाला होता , शेवटचे कैक मैल जंगलचा रस्ता होता , मी आपला कुठे वाघ सिंह दिसतोय का बघत होतो, (नाही दिसला) त्या गर्द झाडीत. हॉटेल बरं होतं आणि आजूबाजूला थोडं थंड होतं , बारीक पंखा लावावा लागला तरी. 

सकाळी लवकर उठून आमही त्या  जन्गलात गेलो जीप सफारी ... एक सांगयचं म्हणजे हि लोकं उठून पटकन चहा देत नाहीत , मी शोधाशोध करत होतो मग त्या माणसाला म्हंटलं कि मला ते किचन दे उघडून मीच करून घेतो (साला सकाळी चहा नाही म्हणजे काय?). 

निसर्ग म्हणजे किती निसर्ग ?  सुंदर हिरवं होतं सगळं . नजर जाईल तिथे जंगल अनेक अनेक पक्षी दिसले खूप झाडं दिसलीत हत्ती, हरणं दिसलीत गेंडे पण खूप दिसले,  अगदी जवळून. एके ठिकाणी तर इतकी निरव शांतता होती कि त्या ड्राइव्हरला  मी म्हंटल कि पाच मिंट गाडी बंद कर मला शांतता ऐकायची आहे आपण एरवी नुसता गोंगाट ऐकतो शांतता पण खूप बोलते . एक छोटी नदी वाहत होती पक्ष्यांची किलबिल घन दाट जंगल ... इतक्या साऱ्या प्रवासाचं सार्थक झालं. खरं तर त्यात खूप समाधान होतं  तरी आम्ही म्हणालोच तो जरा वाघ- सिंह दिसला असता तर बरं झालं असत. तिथे एक हत्तीची सफारी पण आहे तो हत्ती तुम्हाला पायवाटेने आत जन्गलात घेऊन जातो आम्ही नाही केली ती, कधी गेलात तर आधीच बुक करून ठेवा आणि दोनदा जाऊन या जंगलात छान आहे. मला तिकडला एक माणूस म्हणाला कि खूप पाऊस लागला लागलं कि सगळे प्राणी जंगल सोडून रस्ता ओलांडून, पलीकडे डोंगरावर जातात , मग आम्हाला कळतं कि आता नदीला पूर येणार, जंगल बदच असतं म्हणा पावसात.  पण त्या प्राण्यांना अचूक समजतं कधी सोडायचं जंगल ते. माणसांनां काही करत नाही म्हणाला,  शांत पणे मनुष्य वस्तीतून जातात. (प्राणीच ते, उगाच त्रास दयायला माणूसआहे का तो?)आसाम ला तर गेंडे सगळी कडे दिसतात म्हणजे आपल्या कडे कसं गाई दिसतात तसे हे गेंडे आरामात फिरत असतात (अगदीच नसेल गाई सारखं पण सर्रास दिसतात). 

काझीरंगा ला एक बाग आहे छान फुलं आहेत,  छोटं museum आहे बांबू ची बाग आहे अनेक बांबू आहेत तिथे आणि एका स्टेज आहे ती लोक लोकनृत्य करून दाखवतात , दिवसा झलक असते रात्री तासा  भाराचा शो असतो नक्की पाहून या तास दोन तास काढून जा छान आहे ते सगळं. आमच्या ग्रुप मध्ये एक कथक शिकवणारी होती, अनेक वर्ष तिची नृत्य अकॅडेमी आहे , तिला पण इतकं आवडलं हे सगळं , मला मध्येच त्या नाचणाऱ्या ने काय दाखवलं ते सांगायची, म्हणून मला अधिक मजा आली. 

मी मुंबईचा म्हणजे, भारताचा पश्चिम भागातला आणि आसाम म्हणजे पूर्व, पण नाचातून ज्या गोष्टी  सांगतात तिथले नृत्य करणारे ते सारख्याच आहेत आणि अनेक अनेक वर्ष तीच परंपरा. अजब आहे आपला देश खूप वेगळा तरी एक सारखा...

दुपारी तिथून निघून आम्ही थेट शिलॉंग ला जाणार होतो सात आठ तास लागले आम्हाला.  जेवण एक  दोन चहा सगळं झालं.. वाटेत एके ठिकाणी चहाची टपरी होती टपरी , मी चहा सांगितला अजून दोघांनी पण हो म्हंटल , त्या माणसाने संत पणे चहा केला , इतका छान होता कि मी अजून सांगितला मग अजून कुणी आणि दर वेळेला तो परत नव्याने आधण ठेवायचा त्याला म्हणालो कि अरे ठेव कि जास्त आम्ही इतकी लोक आहोत , नाही मी तय्यारच चहा करतो... काय बोलणार? चहा एक नम्बर होता.  पण सांगायचं म्हणजे फार घाई नाही कसली, सगळं निवांत. येताना रस्ता मध्ये मध्ये खराब होता, "प्रगती पथ पे है"  असे बोर्ड होते, (लवकर करा प्रगती असं सांगावं वाटलं त्यांना) आमच्या इथे पण फारा वर्ष प्रगती पथ पे काम चालू आहे तसं असेल बहुतेक, वर म्हंटल तस सगळा भारत सारखाच.  

वाटेत जाताना छोटी गावं लागत होती आणि बुधवार चा बाजार वगैरे असतो ना तसा खूप ठिकाणी लागला होता लोकांची वर्दळ, काय काय वस्तू होत्या आणि सगळं प्रगती पंथ पर असल्यामुळे गाडी संथ चालत होती म्हणून मला ते सगळं छान निवांत पणे बघता येत होत,  मला शॉपिंग मध्ये फार रस नाहीये पण असा बाजार वगैरे भरला ना कि मला त्यात फिरायला जाम आवडतं. (फिलाडेल्फिया ला एकदा मी स्वाती आणि केदार माझी भावंड आम्ही त्या एका बाजारात तास डीड तास घालवला, काय काय गोष्टी होत्या वेगळं खायला खूप रेल चेल, खूप स्वच्छ होता म्हणा ते  ) एकदा उतरून जाऊन यावं वाटत होतं पण तेवढयात गाडी खरंच प्रगती करायची.  मस्त होतं सगळं खूप उत्साही आनंदी लोकं.... रंग बिरंगी वस्तू, खाणं आणि काय काय ? 

आम्ही शिलॉंग ला जाणार होतो पण ते परत गुवाहाटी करूनच होतं, शिलॉंग म्हणजे मेघालय ची राजधानी (सांगून ठेवतो उद्या KBC विचारलं तर) आणि गुवाहाटी ते शिलॉंग जाताना एका रस्त्यात डावीकड़े आसाम आणि उजवीकडे मेघालय असय. आमची गाडी मेघालयात शिरली तेव्हा एका प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे स्वछता , रस्ते छान झाले साफ होतं सगळं. आसाम घाण नाहीये पण मेघालय स्वच्छ आहे. स्वःछ्ता हि अंगात असावी लागते. 

शिलॉंग ला रात्री पोचलो बऱ्याच, बस छोट्या गल्ली बोळातून जात होती एकदम ते "तू कहा ये बता " मधल्या गण्या सारखं होतं.  हॉटेल छोटं होतं पण रूम्स स्वच्छ आणि छान होत्या. 

सकाळी उठलो तेव्हा वातावरण पण छान होतं. सकाळी आम्ही शिलॉंग ला फिरलो एक धबधबा आहे elephant falls तीन टप्यात आहे म्हणजे तीन पायऱ्या सारखा हळू हळू पडतो आणि दोन ब्रिज आहेत  त्यातून पार जायचं  मस्त पाणी अंगावर पडतं , खूप गर्दी होती आणि लोकं सेल्फी काढण्यात जास्त रंगले होते समोर इतकं सुंदर दृश्य असताना स्वतः किती सुंदर दिसतोय हे पहाण्यात बहुतेक जण रमले होते (नर्ससिस्ट नावाचा एक ग्रीक माणूस होता त्याची एक गोष्ट आहे ती वाचा कधी) असो , पण एकूण सकाळ सुंदर गेली. मी शिलॉंग ला १९८७ साली गेलो होतो एका दिवसा करता त्यात हि जागा मला लक्ख आठवते तसच आहे सगळं, फक्त गर्दी आहे जास्त आणि शो शा जास्त आहे निसर्ग तसाच आहे. इथली लोकं खासी आहेत म्हणजे खासी जमात आहे, तर ह्या लोकांनी ह्याचं नाव "का क्षद लै पटंग खोहशेव" असं ठेवलं (सगळी कडे अशी बोबडी वळणारी नाव आहेत ), म्हणजे तीन स्टेप्स चा धबधबा  कारण तसाच आहे तो पण ह्या  falls ला  इंग्रजांनी elephant हे निर्बुद्ध नाव दिलं कारण इथे हत्ती सारखा दगड आहे, त्यांना काय दगड कळलं कुणास ठाऊक? 

आमचा पुढचा चेरापुंजी ला होता असेच खूप तास वाटेत काही गुहा लागणार होत्या आणि मग एक मोठा धबधबा आणि नन्तर तो रूट ब्रिज आणि भारतातलं सगळ्यात स्वच्छ गाव आणि पारदर्शक नदी ... आणि हे पाहायला आमची बस त्या रस्त्या वरून धूम निघाली ... 


ती सगळी सहल आता पुढच्या भागात.... 








Bamboo

















चहा 

Elephant Falls