Tuesday, September 8, 2015

केरळ - मुनार (Keral - Munnar)

पहिली गोष्ट जी मला कोची विमानतळा च्या बाहेर आल्यावर जाणवली  ती म्हणजे स्वछःता आणि शिस्त. मला खर तर विमानतळच फार आवडल. छोट आहे पण निट  नेटक आणि स्वछः . तशी मी लहान लहान विमानतळ पाहिली आहेत पण त्यातल हे सगळ्यात छान आहे अस मला वाटल. आम्ही गाडी करून थेट मुन्नार  ला गेलो.

कोची ते मुनार  सगळा घाट रस्ता आहे रात्र असल्यामुळे बाहेर फक्त अंधार आणि अंधार होता, बारीक पाउस होता, पण रस्ता चांगला होता खड्डे नाहीत कि स्पीड ब्रेकर्स नाहीत.  आम्हाला मध्ये मध्ये छोटी छोटी  गाव वजा वस्त्या लागत होत्या, मुसलमान लोकांची पण होती एक वस्ती, मधेच एक चर्च सारख पण लागल इथली धार्मिक विविधता एकदम प्रखर्षाने जाणवली. आमच्या ड्रायवरच नाव  शाहूल होत चांगला शर्ट आणि जीन्स घातलेला आणी  व्यवस्थित गाडी चालक होता तो मुसलमान आहे हे आम्हाला चार एक दिवसाने कळल  कारण एकदा गाडीत  अल्ला अस काही लागल म्हणून .

खूप वेळ (अडीच तीन तास ) गेल्यावर आमच्या ड्रायवर ने फोन केला ते हॉटेल कुठे आहे विचारायला, बाहेर अगदी किरर्र अंधार होता हवा पण थंड होती, मे असून गार  वार पाहून बर वाटल, आम्ही थोड पुढ आलो होतो मुन्नार तस अजून २० एक किलोमीटर लांब होत पण आमच हॉटेल मुनारच्या अलीकडे होत जंगलात आणि नाव होत "forest haven" "HAVEN " असच नाव होत ,  मुख्य रस्ता सोडून आम्ही एक दोन किलोमीटर जंगलात गेलो आणी एका जंगलाच्या मध्यात असलेल्या हॉटेलात गेलो आजूबाजूला नुसती घनदाट झाडीच झाडी …सकाळी बाल्कनी च्या बाहेर पाहिलं तर नुसतच जंगल बाकी काही नाही , हिरव्याच रंगांच्या शंभर छटा अगणीत फुल आणि नाना प्रकारच्या  पक्षांचे आवाज, सूर्यप्रकाश सुद्धा खाली सरळ न येत थोडा जंगलात पानान मध्ये खेळून खाली येत होता, मे महिना असून सुद्धा, बाहेर थंड गार वातावरण, थंडीत काय होत असेल कुणास ठाऊक.


शुद्ध हवा आणि निसर्ग आपोआप आपल्याला  ताज करतो इथे तर फक्त oxygen pollution  नाहीच , हॉटेलच्या पाठी  लहानसा ओढा होता आणी तिथे जाईला एक पायवाट, हल्ली नसतेच न कुठे पायवाट त्या मुळे मला फार मस्त वाटलं, पाय वाट पण लॉन सारखी, दोन दिवसाने मी एकटाच अगदी थेट जाउन आलो खूप सुंदर अशी जागा होती पुढे एक दोन ओढे मिळून थोड मोठ अस पाण्याचा झरा होऊन खाली जात होता आणि रस्ता संपला. वाहत्या पाण्याचा आवाज आणि हलकेच किड्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज, एखाद्या संगीत महिफिलीत असल्यागत वाटल.

थोडा नाश्ता पाणी करून आम्ही मुन्नार ला निघालो, इतका सुबक डौलदार रस्ता होता … म्हणजे आदल्या दिवशी आम्ही इतक्या मन मोहक रस्त्यातून आलो ह्याची जाणीव झाली, ढग खाली आले होते एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला दरी, विशेष म्हणजे डोंगर सुधा हिरवे गार आणि दरी सुद्धा नुसती गर्द हिरवी God's own country म्हणजे काय ते लगेच जाणवलं, वाटेत एका observation point la थांबलो , तो point म्हणजे एक  दरी होती आणि  ती तुम्ही बघायची. बाजूला दोन दुकानं टाकली होती , आम्ही लगेच शे दोनशे रुपयांची खरेदी केली, वाळवंटात  जरी  आम्ही गेलो न  तरी  सुद्धा आम्ही तिथून पाच पन्नास रुपयांची वाळू आणू ती सुद्धा मुंबईची म्हणून विकली तरी घेऊ , स्वभाव  काय करणार (ह्यावर केरळा आयुर्वेदिक मध्ये पण औषधाला  ही  औषध नाही सापडल, शोधलं मी.) मग पुढे जाउन ह्याने फसवलं  नसेल न?  म्हणून चिंता :).

आम्ही तिथे हत्ती वर बसून फेरी मारायला एक जागा आहे तिथे गेलो तर तिथे ही भली मोठी रांग, मग  आम्ही तिकीट घेतल आणि धरण बघायला गेलो, तर तिथे trafficjam लागला म्हणून वाटेत गाडीवर बिर्याणी खाल्ली आणि परत आलो. त्या हत्तीच्या पाठी बसून फेरी साठी रांग  बघून मला वाटल कि चांगल  असेल  तर  फसवलं आम्हाला १५०० रुपयात पाच मिंट पाच मेटरे फेरी मारली, तरी सुजन वाचकाने अजिबात मुन्नार ला  गेल्या वर त्या हत्ती वर  बसू नये चोर साले, पण हाच काय तो वाईट अनुभव बाकी सगळ केरळ प्रवास उत्तम झाला, ह्या लोकांनी खूप हुशारीने tourism market केल आहे तेव्हा थोडस हे अस चालायचंच.

केरळच एक प्रमुख आकर्षण म्हणजे तिथल्या चहाच्या बागा आणी तिथे असलेल्या चहा चे कारखाने टाटा चेच सोळा सतरा आहेत म्हणे. आम्ही पहिला तो कारखाना चोतेखाना होता बाजूला छोटीशी शोभेला एक चहा ची बाग, खर  तर अख्या मुन्नारला असंख्य चहा चे  मळेच मळे आहेत, सगळे डोंगर त्या मुले हिरवे गार दिसतात एके ठिकाणी तर आम्ही त्या बाईका पण पहिल्या पाठीवर ती मोठ्याली बास्केट घेऊन चहाची पान वेचताना. तर त्या कारखान्य मध्ये पहिल वहिल चहाच मशीन मुन्नारच   पाहिलं टेलेफोन exchange (त्याचा चाहाशी असलेला संबंध नाही समजला) गोऱ्या साहेबाचे चित्र, पूर आलेला त्या वर्षाचे चित्र वगेरे, मग आम्हाला तो कारखाना सापडला अलीकडे होत ते museum असेल, खूप निरनिराळे वर खाली जाणारी यंत्र, त्यात फिरणारी पान, चहा ची पावडर निघणारा एक यंत्र मग  चाळणी , आम्ही नुसते इकडे तिकडे फिरत होतो आणि अचानक तिथल्या एका कामगाराने एक चहा प्रेमी लांबून ओळखला, हसला आणि खुणे ने या म्हणाला, मला काहीच नाही समजलं , म्हणून  त्याने माझा हात धरला आणि पहिल्या यांत्त्र कडे घेऊन गेला आणि पोत्याटली पान माझ्या हातात टाकली आणि टाक म्हणाला आणि आमच्या कुटुंबाला काढा फोटो, अस करत त्याने मला अक्खा कारखाना फिरवला आणि तोडक्या मोडक्या भाषेत मला सगळा process समजावला इतका काय माझा चेहेरा खुलला होता कि फोटो पण बरे आले माझे. पण ही लोक  खूप हसरी आहेत  सारखी तोंड वर smile आणि हा माणूस तर मला अगदी देवदूता  सारखाच वाटत होता, मला स्वर्गातूनच त्याने हिंडून आणल होत अगदी हात धरून, मग आम्ही खरेदे  केली (ते सांगायलाच नको)पण हा माणूस काही दिसे न  शेवटी सापडलाच, एका बाकावर बसला होता (हसत)त्याले टीप म्हणून  थोडे पैशे दिले तर असू देत म्हणाला, शेवटी दिलेच मी, पण एरवी आपल्या मागे लागोन गोष्टी विकणारे आणि हा स्वताहून आपल्याला कारखाना दाखाहून पण पैसे नको म्हणारा माणूस बघून मी त्याचा चहा ता झालो.











एकाच गोष्टीची फार खंत वाटली  त्या चहाच्या कारखान्यात डीप डीप चहा होता चान उकळून नाही दिला :( . म्हणजे चहा नको का हो द्य्याला चहाच्या कारखान्यात? आता कोकणात canned tuna दिला तर चालेल का? भोपाळला गोदरेज फूड्सच Audit करताना आम्हाला ती  लोक पाण्याच्या बरणीत ते jumping च fruit juice दय्याचे एकदम ताझं, तसा चहा मिळाला असता तर गळ्यातली माळच  काढून दिली असती मी पूर्वीचे राजे द्यायचे तसे.

दुसर्या दिवशी आम्ही थोड (जास्तच)  आरामात निघालो आणि तसही आमच हॉटेलं पासून मुन्नार तासा भराच्या अंतरावर होत  त्या मुळे आम्ही मुन्नार ला शीरतानाच एका चांगल्या ठिकाणी जेवलो. आमच्या हॉटेलात मल्लू खाणं नसून पंजाबीच होत आता केरळ ला जाउन पंजाबी कोण खाईल? पण तो वेटर म्हणला कि सगळे गेस्ट बाहेरचे असतात न म्हणून नाही करत मल्लू , तिथे तर नाश्ता करायला एक गुजराती कुटुंब शेव, पुऱ्या, ठेपले, लोणची आणि अस बरच काही घेऊन यायचे आणि तो सगळा नाश्ता करायचे …. आत्ता बोला ही लोक काय खाणार मल्लू जेवण? अंड बघून नाक मुरडलं  बाईने …. जाऊद्या नसत सगळ्यांच्या नशिबात   मासे खाणे. तर पहिल्यांदा आम्हाला त्या हॉटेलात केरळ special माशे आणि  भात खाईला मिळाला त्या नंतर खुपदा म्हणजे रोझच मी सांबर भात नाहीतर तत्सम काहीतरी खाल्लं.

मुन्नार अख्खं टेकडी वर आहे  सगळे वेडी वाकडी वळण आणि घाट रस्ता, म्हणजे तुम्ही जर  नुसतच जर गाडीतून  फिर्लात न तरी सुद्धा एक सहल होते.  ड्रायवर  आम्हाला एका थीम  पार्कला घेऊन गेला रोप वौकिंग ,सायकलिंग अस काहीतरी होत प्रवेश शुल्क १५०० का काहीसा होता आणि बसा किव्हा नका तेवढेच पैशे मग आम्ही  तिथे न जात सरळ Eravikulam National Park ला गेलो, तिथे भली मोठी होती, पण आम्ही जायचच  अस ठरवल होत म्हणून थांबलो, एकूण अस लक्षात आल कि लोक तिथे कॅम्प करायला वगेरे जातात, मग समजल कि ती रंग बस साठी होती,पण ती बस कुठे घेऊन जाणार वगेरे काहीच ठाऊक न्हवत. एक  तास भर थांबल्यावर आमचा नंबर लागला आणि ती बस आम्हाला अजून एका उंच टोकावर घेऊन जायला लागली, अगदी एक गाडी जाइल एवढीच जागा, मधेच एक गेट आणि मग सुसाट वेगात तो बस वाला निघाला समोरून तशीच छोटी बस आणि आमची बस  एकदम कडेला  जाउन थांबून पुढे गेली, साधारण  पणे आपण सगळ्यांनीच अश्या चित्तथरारक बस मधून प्रवेश  केला असतोच त्यांच्या करता रोजचच  काम  असत आपण उगीच जीव मुठीत घेऊन बसतो. एका वळणावर मग अचानक आम्हाला   एक ढग  खालून वर  येत असताना दिसला आणि सगळी लोक सैर वैर होऊन फोटो काढायला धावले मग कुणाच्या ही लक्ष  त्या  रस्त्या कडे गेले नहि.

एक दहा मिनटाने आम्हाला  त्या बस ने एका डोंगरावर सोडला, आता काय? तर  ते National  Park निलगीरी थार  नावाच्या एका बकऱ्या साठी प्रसिद्ध आहे तो प्राणी डोंगरावर राहतो आणी  सहज कडा चढतो, जगात सर्वात जास्त बकरे इथेच ह्याच ठिकाणी मिळतात. वास्तविकता हे बकरे साहेबांनी आपली शीकारीची हौस भागवायला आणले होते, पण आता हे एक  "Reserve" आहे इथे (आणी भारतात )आता (कायद्याने) बंदी आहे. परत एका चढाई वर आम्हाला चढायला लागल , त्या गेट च्या आत जाउन नुस्त चालायचं होत मैल भर, मला टिकेट सापडलाच नाही, एक तर कुणी टिकेट विचारल की  मी खूप घाबरतो, उगीच , मग त्याला मी इतर सगळी कागद दिले पण टिकेट काही दिले नाही, पण हे केरळचे लोक हसरीच असतात, राहूद्या राहूद्या चालेल म्हणला (ते टीकेत तीन दिवसाने मला माझ्या पाऊच  मध्ये नित घडी करून ठेवलेल दिसल).  तो छोटा स रस्ता इतका मोहक होता एक तर ढग खालून बघायची सवय त्या मुळे वरून खाली ढग बघायला वेगळच  वाटत होत, तस आपण विमानातून बघतो, पण हे उभा राहून मोकळ्यात आणि ते ढग अशे एकदम घरातून निघाल्या सारखे, धूर असतो बघा असा चिमणीतून किव्हा कोकणातल्या घरातून असा निघत असतो? तसाच पण पांढरा ….  शूभ्र  थवेच थवे … थंड वातावरण सग्ळ  हिरवगार विविध आकाराचे ढग डोंगर झाड  छोटा रस्ता , एकदम ताज तवाना वत्ल.  मग आम्ही  शेकड्याने फोटो काढले, पण क्यामेरा भाव टिपतो  भावना नाही ते वाहणारे ढग थंड हवा सळसळणारी पान कसा काय टिपणार? त्या पेक्षा दोनच फोटो काढून चार घटका त्या जागेचाच आस्वाद घेतला असता तर जास्त बर झाला असत. हे दृश्य माझ्या  मनात अगदी थांब रुतलं आहे, त्या झुरिक च्या छोट्या विमानात बसून ते आल्पस पहिला होता न?अनेक वर्षान पूर्वी तस झाल नशिबाने तेव्हा माझ्या कडे विमानात न्हवता क्यामेरा नाहीतर त्या फोटो पाई मी आल्पस बघितलाच नसता. तर आम्ही मह ते मैल बर अंतर चढलो तो बकरा वजा हरण पाहिलं त्याचा पिल्लू पहिल. पुढे एक गेट होत, मला वाटत ते  आतल्या hiker लोकां साठीच होत , काय मस्त वाटेल न? रात्री मिट्ट अंधार आणि अस फेर फटका मारायचं.  खूप सोंदर्य सुधा कधी कधी गूढ आणि थोडा भीती दायक वाटू शकतो. कोल्हापूर ते कोकण जाताना त्या राधानगरी घाटात असच दिसत निसर्ग ……

दोन अडीच तास फिरून मग आम्ही पुन्हा बस च्या रांगेत उभे राहिलो आणि दहा मिनटात खाली आलो, पण खाली पण चांगल होत. वाटेत थांबून कडक चहा घेतला (तो लागतोच त्याच्या शिवाय पान हलत नाही आणि इथे तर पान सुधा चहा चीच).  वाटेत थांबून आम्ही भुट्टा  खाल्ला आणि गम्मत म्हणजे तो भुट्टा  शेकायची पद्धत मला आवडली.  आमच्या लहान पणी , कालही वाला यायचा तो काय ते पोव्देर लावायचा आणि हाताने एक चक्र फेरउन अशी आग काढायचा  त्या वर ते पातेलं उपड  ठेऊन मस्त गरम करायचा, तर ही लोक भुट्टा असा भाजत होते.


मुन्नार ला एके ठिकाणी कथकल्लि  आणि कालारीपायातु चे प्रयोग होतात तास भाराचे कार्यक्रम असतात आम्हाला काय त्या नाच मध्ये रस न्हवता म्हणून आम्ही तिथे तो मारामारी वाला कार्यक्रम पाहिला (टीकेत तस महाग आहे, पण लोक कला जपतायेत म्हणून चालेल), अस खाली कुस्तीचा कसा आखाडा असतो तस  होत तीन बाजूला बाजूला वर अश्या खुर्च्या टाकल्या होत्या आणि खाली त्या हौदा सारख्या जागेत ती मुल काय काय करामती  करत होती म्हणून सांगू , चाकू म्हणू नका तलवार म्हणून नका दान पट्टा म्हणून नका वेड्या वाकड्या उद्या काय धाधड उड्या  काय मग  दिवे घेऊन काय नाचले फारच छान, म्हणजे लोककला जपायची आणि त्यात थोडे पैसे मिळाले तर तरुण मुल सुधा त्यात अपोप येत असतील न, साधीच मुल होती, पण मग नेहमी सारख फोटो काढायचे आहेत का? अस म्हणून फोटो काढून थोडे पैशे कमवायला बघत होते . पण काय हरकत आहे ते थियेटर वाले जबर पैशे घेत होतेच न? त्या पोरांनी सुधा थोड कमवले तर काय हरकत आहे? ह्या लोकांच एक खूप चांगलंय म्हणजे त्या लोकांनी पर्यटन ह्याचा खूप चांगला उपयोग करून घेतला आहे आणि फार महाग अस हि नाही आणि खूप गर्दी केली आहे घाण आहे बाहेरची लोक घुसून काही धंदा करून त्रास देतायेत असही नाहीये. ती लोक मुळातच हुशार असतात आणी जाज्वल्य अभीमान आपल्याकडे चार लोकांपुढे मराठी बोलायला लाजणारी माणसं आहेत. आपलेच पाय  खेचायचे आणि आणि बाहेच्या लोकानां आत येऊ द्यायचं. महाराजान पासून चालू आहे  आता काय बदलणार?



मग आम्ही "परत" थोडी खरेदी केली (आणी मी चहा घेतला), दुकानदार बाई होती मी चहा घेतला तिथे पण, बाइका भारी आहेत (म्हणजे नुसत्या शरीराने नाही), खूप ठिकाणी पाहिलं मी, जाताना वाटेत काहीतरी खाईला घेऊन जाऊ असा विचार केला, कारण केरळात पनीर नको वाटत होत अस ही मला पंजाबी जेवण फार रुचत नाही आणि त्यात एक मल्याळी माणूस करणार म्हणजे बोंबलाच. आमच्या हॉटेल जवळच (तरी एक चार किलोमीटर अंतर असेल) एक घागुती हॉलिडे होम होत तिथे थांबून विचारल तर एक माणूस tv पाहत होता, काही नाही म्हणला, मुलीला बाथरूम ला जाईच होत, त्याला विचारल जाऊ दे का? हो हो म्हणला मग ती आणि तिला सोबत म्हणून बाईको  दोघी गेल्या घराच्या पाठच्या बाजूला, इथे स्वचः असत त्यामुळे तसा प्रोब्लेम न्हवता. बाहेर मी थांबलो होतो तेव्हा एक बाई मला स्वयपा घरात जातान दिसली तिला विचारल काही खाईला मिळेल का म्हणून  थांबा बघते म्हणाली, तो पर्यंत दोघी आल्या मग ती बाई बाहेर आली आणि काय हवाय म्हणाली म्हंटल काय द्या असेल ते, संभार आहे, फिश फ्राय  एकच आहे पोळ्या देते म्हणली , म्हंटल लोकल खाईला मिळालच नाही आणि ही आमची मुलगी वेज आहे  म्हणालो, बर म्हणाली देते मी  सगळ जेवण,  तीन बांधून दिल खूप सार , आमच्या हॉटेलात  जाउन पहिल तर तिने भाजी कोशिंबीर मासा सांभार भात पोळ्या  असा  सगळाच दिल होत. किती झाले? १७५०- माझा चेहरा लगेच बोलतो आ वासून बघीतल तर तिने कागद दिला त्यात १७५/- अस होत अरे सॉरी सॉरी… एक शुन्य जास्त लावला चुकून. म्हणजे एक वीस सेकंदात माझ्या भावना कौतुक  आश्चर्य राग  आदर इतक्या ठिकाणी फिरून आल्या, मग आम्ही सगळेच हसलो तिला दोनशे दिले म्हंटल ठेवा "लीली आणटी" तीच Lilly Gardens  Holiday homes नावच हॉटेल चालवतात नवरा बायको. तिने पण हसून स्वागत केल निरोप दिला आणि जेवण गरम आणि स्वस्तात दिल. ह्या छोट्या गोष्टीन मुळेच खूप फरक पडतो आता आम्ही तिथे आयुष्यात परत कधी जाणार सुधा नाही हजार मागितले असते तरी मला द्यावे लागले असते, पण त्या बाईने आम्हाला फक्त भाताचे आणि माश्याचे पैशे लावले होते मुलीला फुकट दिल होत, पण हा अनुभव मला आणिक के दोन दा   आला सांभार राइस चे काय पैशे घेणार मुलीलाच देताय न ?


त्या दिवशी पोट आणि मन दोन्ही भरून गेल …. दुसर्या दिवशी आम्हाला ठेकाडी ला जाईच होत …