Monday, November 2, 2015

केरळ - ठेकाडी (Keral -Thekaddy )

आम्हाला शाळेत असताना उटकमंड नावाचा एक धडा होता . उटी बद्दल होता धडा,  त्यात  चित्र होता,  एक  असा छोटा नागमोडी रस्ता होता आणी बाजूला एक छोटा कंदील सारखा street light होता, देवानंद च्या "तू कहा ये बाता" मध्ये कसय त्या टाइप्स , मला ठेकाडी मध्ये त्या संध्याकाळी तो एक फील आला, म्हणजे मे असून  सुद्धा थंड हवा हलका उजेड चार लोक टपरीवर उभे आहेत , कुणालाच घाई नाही लांबून कुठून अस संथ कर्नाटकी संगीत. मी खर तर त्या जंगल बोटीच्या तिकिटाच print out काढायला निघालो होतो. आम्ही एका home stay मध्ये होतो "Kerala House", त्या माणसाने सांगितल कि उद्याच  तिकीट आज काढा मग त्या मागे लागलो त्याच नेट नेमक बंद , मयूर ला सांगून ते काढून घेतल आणी त्याने मला इमेल केल ते  आणायला मी बाजारात गेलो तेव्हा येताना मला हे अस दृश्य दिसल. 

आम्ही मुन्नार हून अकराला निघालो सगळा घात रस्ता एक हिल स्टेशन ते दुसर परत तोच तसाच हिरवा गार स्वछ रस्ता लहान लहान घर हिरवे डोंगर तसाच रस्ता आम्हाला नंतर अल्लेपी ला जाताना पण लागला पण कंटाळा नाही आला तेच दृश्य पाहताना …. और दिखाव और दिखाव अस होत , मी एक पाहिलय इथे हिल स्टेशन ला भिकारी नाहीयेत त्या मुळे त्रास नाही होत, कुणी  मागे लागून वस्तू विकल्या नाहीत की काही नाही. वाटेत एक धबधबा लागला तिथे एक दोन दुकानं होती. वाटेत गाव लागत होती पण तशी सुख वस्तू वाटले सगळे, गरीबी असेल असणारच पण प्रखर्षाने जाणवत नाही. 

एका मोठ्या गावात आम्ही जेवायला थांबलो साध होत हॉटेल पण स्वछ उजेड आणी भरलेल होत गर्दी न्हवती पण भरल होत, त्या टेबल वर एक लाल रांगाच पाणी ठेवल होत सगळ्यांच्या आम्ही मिनेरल मागवल आणि त्या वेटर ला विचारल की काय हे? तो म्हणला की आयुर्वेदिक पाणी , मी पिउन पहिला मला आवडल गरम होत म्हणजे तेलकट खाऊन हे पाणी प्यायचं मस्त पुढे कुठे नाही दिसलं मला हे अस पाणी. केरळ ला मेनू कार्ड  मध्ये  मला एक जाणवल कि फिश बरोबर बीफ आणी पोर्क पण असत मेनू मध्ये चिकन  नाही दिसल (मी नाही खाल्ल )पण सर्व धर्म सम भाव.  तिथे  तो वेटर पण हसरा होता आणि सगळ्यांनी डोक्यावर टोप्या घातल्या होत्या किचेन मध्ये घालतात तश्या. जेवण एकदम सही, कुटुंबाने भाजी मागावली मी अंड आणि भात आणि सांबर , माझ्या मुलीला पण भात फार आवडतो आणि ती लोक उकडा भात करतात पंधरा  नाही सांबर घालून छान  लागतो आणि तिथलं सांबर  पण वेगळ असत भाज्या खूप घालतात आणि परत चटणी देतात. तीच भाजी पोळी खाउन झाल्यावर तिला ही हवा होता सांबर भात पण रीचे प्लेट नको होती त्या वेटर ला विचारल मी अरे नुसता सांबर भात मिळेल का , त्याला समजलच नाही म्हंटल मुलीला  थोडा सांबर भात दे मेनू मध्ये असकाहीच न्हवत मग त्यला समजल त्यानी ताट आणला त्यात भात घातला आणि तिथे खानावळी  सारख सांबर भाजी चटणी घेऊन फिरतात न? तास वाडग  घेऊन आला आणी काय हवय बोला  अस केल म्हंटल सांबर, तीन दिवसाने इतकं परफेक्ट केरळ जेवण मिळाल होत, मस्त भात सांबर ओरपून बिल मगीत्ल तर ३०० त्यात वेटर च पण होत, म्हंटल अरे तू ते सांबर भात नाही लावलास बीलात ? नो नो व्हाट  सर? नो मनी फॉर इट म्हणून हसला त्या सगळ्यांना बाइको ने फार छान जेवण आणी सर्वीस अस पण सांगीतल, थोडी अधिक टीप देऊन आम्ही मग निघालो. गाव असल तरी रस्ते छान   लोक तशीच, म्हणजे एकूणच लोक सेम टू  सेम आहेत इथे , कुठे ही जा मुन्नार ते कोची, आपल्या कडे बघा मुंबई पुण्याचा माणूस वेगळा मुंबईचा आणि पुण्याचा  वेगळा असतो घाटावर वेगळा कोकणात वेगळा विधर्भात निराळा अगदी नाशिक चा सुद्धा निराळा कळतो म्हणजे दिसतोच इथे कुठे हि जा वेशभूषा आणी  जेवण सेम आम्हाला हत्ती  वरूब फिरवलेला आणि बोटीतून नेणारा माणूस सेम कपडे , तोच  वर्ण काहीकाही नाही. तर हे गाव असून खेडे न्हव्ते गाड्या घोडे होते चांगल होत आणि त्यात भिकारी नाहीत, दुपार असून उकडत न्हवत , छान जेवण झाल होत रस्ता सुरेख हिरवं गार सगळीकडे, असा मस्त प्रवास  करत  आम्ही ठेकाडी कडे निघालो

वाटेत आम्हाला ते स्पाइस गार्डन्स लागली, मग आम्ही एकीकडे गेलो आणि खूप सारे पैशे देऊन वायफळ औषध पण घेतली …. म्हणजे स्पाइस म्हणून आत आयुर्वेदिक औषध विकतात. तस तिथे नेउन आम्हाला सगळी बाग फिरवली काय काय उग्त कस कस उग्त ते पण दाखवल छान होती बाग, दगड टाकला तरी  उगवेल अशी जमीन आणि पोषक अस वातावरण त्या मुळे खूप छान पीक काढत असतील ही लोक. ते झाल कि मग आम्हाला त्यांच्या दुकानात घेऊन गेले आणि पोट कमी करायला औषध केस वाढवायला बुद्धी वर्धक आणि अस म्हणून दोन चार असेच काही उत्पादने चिकटवली, खूप चांगलय म्हणून   … काही पण , तर माझा सल्ला असा कि तिथे जा बाग बघा गरम मसाला  घ्या आणि  या बाहेर, औषध वगेरे काही घेऊ नका.

तेवढ्यात मला मी ज्या होम स्टे मध्ये बुकिंग केल होत त्याचा फोन आला चार वाजले होते १२ च चेकीन होत, त्याला म्हंटल आलोच आमचा चालक आणि त्या हॉटेल चा मालक काही तरी बोलले आणि दहा मिनटात आम्ही एका रस्त्यात येउन थांबलो छोट्या रस्त्या कडे बोट दाखून म्हणला  कि हेच आहे,  थोड  घाबरलो मी, पण आत जाउन पहिला तर थक्कच झालो एक तर खोली खूप मोठी होती स्वछ आणि खोलीतून दिसणार दृश्य अप्रतिम होत सगळ पेरियार जंगल दिसत होत मोठच्या मोठ










एक तर येता येता एवढी हिरवळ आणि आता तर अगदी समोर हातच्या अंतरावर ..  आमच्या होम स्टे  kerala house असा होत http://www.keralahouseperiyar.com/index.html . शिबू नावाचा एक चाळीशीतला इसम चेहरा हसरा बाइको हसरी चा मायला सगळेच हसरे खर तर अखं केरळच हसरं आहे आहो पण रोज सकाळी एवढ सुंदर निसर्ग, मे मध्ये थंड गार हवा जेवायला स्वस्तात आणि उत्तम खाण मिळाल तर का रडेल माणूस?

आमचं होम स्टे पेरियार टायगर रिझर्व च्या अगदी हाकेच्या अंतरावर होत , म्हणजे आमच्या घरा मध्ये आणी जंगलात फक्त एक भींत होती (पण आम्ही भिंती वरून काही चढून जाणार न्हव्तो) पण गेट सुधा शंभर पावलांन वर, तिथून आणखी एक किलोमीटर वर ती नदी आणि तिथून ती बोट किव्हा सहल सुरु होते, पाचाला बंद झाल   होत, म्हणून मग इंटरनेट वरून तिकीट काढून मी प्रिंट  आउट घ्यायला बाजारात गेलो तेव्हा मला ते  सगळ सुंदर वातावरण दिसल.


दुसर्या दिवशी सकाळी दहाला आम्ही एक जीप करून  पेरियार च्या बाहेर फिरून आलो, म्हणजे टेकडी धबधबे अस सगळ पाहून आलो तिथून तमिळ नाडू एक पाचशे मीटर वर असेल बॉर्डर  आहे ही दोन राज्यातली, आपल्याला काही फरक कळत नाही तशीच भाषा (तशीच लोक दिसयला) , ह्या लोकांना दोन्ही भाषा येतात पण इकडचे लोक मलायालामाच बोलतात आणी  ती लोक  तामिळ "च" बोलतात (आपण कस हिंदीत "च" बोलतो तस).   तर त्या ओपन जीप   मधून आम्ही तीन एक तास मस्त फिरलो छान निसर्ग, धबधबा , तशेच ते नागमोडी वळणाचे रस्ते टुमदार बंगले आणी  स्वछ हवा अस सगळ डोळ्यात भरत हिंडलो. ड्रायवर लुंगी मध्ये होता, मी इथल्या taxi  union चा अध्यक्ष का तत्सम काहीतरी आहे अस सांगितल आणी मी कोमिनिस्ट आहे अस पण सांगीतल एक  मुलगी msc   होती लग्न करून bangalore  ला आहे नवरा IT मध्ये दुसरी मुलगी Engineering करते  आहे त्याच नसीर अस म्हणला मी काय रोज नमाझ  नाही करत फक्त शुक्रवारी …… आमच्यात धर्म वगेरे नाही मानत हल्ली फार झालंय  म्हणाला. त्याला मधेच एक फोन आला मग तो जीप मध्ये काही तरी  शोधत होता , मग हसत हसत काही तरी बोलला. मुलीचा फोन, सकाळी तिला सोडलं  बस स्टेन्ड ला दीडशे किलोमीटर लांब आहे कॉलेज तिथेच राहते होस्टेल वर , तर तिच्या कानातल पडल म्हणते  आहे जीप मध्ये, आता नाही सापडत , खोत होत मग मी देईन नवीन घेऊन अस म्हणलो.  जगात बाप हा बापच असतो अगदी इंग्लंड ला सुद्धा मी हेच पाहिलं काही अपवाद असतात….

त्याला विचारल मी की इथे हे बंगले इतके महागडे  वाटतात कस काय? ह्या सगळ्यांच्या मसालेच्या बागा  आहेत  अस म्हणाला आणि सगळ्या बागा क्रीस्चन लोकांच्या आहेत (सारखी जात सांगायचा आणि आम्ही जातीत मानत नाही म्हणाला) ही लोक खूप कष्ट करी, म्हंटल गोव्यात जा मग कळेल.   तर ह्या लोकांकडे जागा कमी पण पीक चांगल आहे आणि किंमत पण खूप मिळते, पण ह्याला पोषक जमीन आणि वातावरण लागत. अजून तरी नशीबाने मुर्खा सारखे लोक बांध काम नाही करत सुटत. अजून किती वर्ष राहत  आहे  कुणास ठाऊक ......

दुपारी आम्ही परत सांभार भात खाल्ला आणि त्या पेरियार रिझर्व मध्ये गेलो.  पाउस  पडत होता  आणि आमची  बोट  तीन ची होती आणि ही एवढी गर्दी.   मग तिकीट दाखवून आम्ही खाली बोटी पाशी गेलो पण रांगेत पण लोक अगदी वेड्यागत करतात बोट जाइल ही भीती धक्का बुक्की शेवटी खाली नदी पाशी गेल्यावर समजल कि चार बोटी आहेत आणि तिकीटावर बोटीच नाव आणि सीट नंबर सुद्धा आहे, अगदी  छान व्यवस्थीत जागा मिळते सगळ्यांना,  लोक अगदीच खूळयागत वागतात एक कपल होत ते तर सगळ्या बोटीत लगबगीने धक्का मारून  आत जायचं (प्रान्त्नाका विचारू  मला मुंबईत राहून अस ही लोक प्रांत वादी  म्हणतात), आम्ही बसलो तरी ती लोक तशी खाली उभी होती त्यांची वेगळीच बोट  होती हनी मून कपल ची वेगळी असेल बहुदा.

मग  आम्ही दीड  तास त्या नदीतून संथ पणे ब्रह्मान केल , हरण रान डुक्कर हत्ती सगळे दिसले वाघ काही दिसला नाही, नाहीच दिसायचा तो कशाला येईल दुपारी लोकांना तोंड दाखवायला ? ते जंगल 1300 किलो मीटर आहे आम्ही दहा   पण नाही फिरलो आणी  आम्ही फक्त नदी लगत  फिरलो वाघ  आत अश्णार जंगलात, पण पक्षी मात्र खूप दिसले, केव्हढ निसर्ग आहे तिथे आणि तिथे मधेच एक रेसोर्ट पण आहे  जंगलाच्या मधेच 24000 24 तासाचे, पण सात  नंतर्काय करणार? त्यांची एक बोट असते फक्त, एक दहा जण असतील तर चांगलं  आहे.


आधी आत जंगलात लोकांना जीप ने  घेऊन जायचे आणि मग  पाई पण हल्ली हल्ली एका हत्तीच्या झुंडीने दोघांना चिरडल त्या मुळे बंद आहे. वाघाने अजून एका ही माणसाला मारल नाहीये हात्तीनेच सगळी माणसा मारली आहेत  ....perception दुसर काय ? मुन्नार  चांगल कि ठेकाडी? तर आम्ही अगदीच जंगला जवळ होत जेवण चांगल मिळाल म्हणून आम्ही ठेकडी म्हणू पण निसर्ग मुन्नार ला खूप  आहे .... दोन दिवस राहायला खूप   उत्तम अस आहे ..... आम्ही आता  इथून जाणार होतो अल्लेप्पी .....